12th results out महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात नागपूर विभागाला यंदा पुन्हा एकदा निराशाजनक चित्र पाहायला मिळाले आहे. एकूण ८८.६७ टक्के निकालासह नागपूर विभाग राज्यात सलग चौथ्या वर्षी आठव्या स्थानावरच राहिला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत निकालात ३.४५ टक्क्यांनी घट झाली आहे.
गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास, २०२२-२३ मध्ये ९०.३५ टक्के, २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये ९२.१२ टक्के असा स्थिर निकाल होता. मात्र यंदा तो थेट ८८.६७ टक्क्यांवर घसरल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा विभागातून १ लाख ५३ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ५२ हजार २३० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. एकूण १ लाख ३४ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात मुलींनी नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असून मुलींचा उत्तीर्ण टक्का ९२.५०, तर मुलांचा ८४.९० इतका आहे.
- शाखानिहाय निकाल
विज्ञान - ९७.२८ टक्के
वाणिज्य - ८४.५३ टक्के
व्यवसाय - ८१.१८ टक्के
कला - ७५.५९ टक्के
आयटीआय - ८४.३० टक्के
विज्ञान शाखेचा निकाल नेहमीप्रमाणे आघाडीवर असताना कला शाखेची कामगिरी चिंताजनक ठरली आहे.
-जिल्हानिहाय आढावा
Nagpur: Class 12th results यंदा नागपूर जिल्ह्याने ९१.६६ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले. त्यापाठोपाठ गोंदिया (८९.५९) व चंद्रपूर (८८.७२) हे जिल्हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. वर्धा (८७.५२) जिल्ह्याची घसरण झाली असून गडचिरोली (७९.६३) सर्वात मागे आहे.
- जिल्हानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
नागपूर - ५७ हजार ३४०
चंद्रपूर - २३ हजार ७३९
गोंदिया - १६ हजार १८४
भंडारा - १३ हजार ९२७
वर्धा - १३ हजार ५८५
गडचिरोली - ९ हजार ९३१
एकूण - १ लाख ३४ हजार ९८८
निकालातील घसरण ही केवळ शैक्षणिक गुणवत्तेतील कमीपणामुळे नसून कठोर परीक्षा पद्धती व कॉपीविरोधी कारवाई यांचा थेट परिणाम असल्याचे दिसून येते. मुलींची सातत्यपूर्ण आघाडी कायम असताना मुलांच्या निकालात झालेली घट विशेष लक्षवेधी आहे. तसेच ग्रामीण व मागास भागातील जिल्ह्यांमध्ये अजूनही गुणवत्तेचा प्रश्न कायम असल्याचे या निकालातून स्पष्ट होते.12th results out नागपूर विभागाने आगामी वर्षात निकाल सुधारण्यासाठी अभ्यासक्रम, मार्गदर्शन व मूल्यमापन प्रक्रियेत अधिक प्रभावी बदल करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.