लाभक्षेत्र गोंधळात शेतकरी होरपळले !

    दिनांक :02-May-2026
Total Views |
जलसंपदा विभागाचा बेजबाबदार कारभार उघड
२० दिवसांनंतर ‘इतर प्रकल्प निवडा’चा थंड प्रतिसाद
संतप्त शेतकर्‍यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

पांढरकवडा,
Water Resources Project जलसंपदा विभागाच्या निष्क्रियता, ढिसाळ नियोजन व पूर्णपणे बेजबाबदार कारभारामुळे तालुक्यातील शेतकरी अक्षरशः होरपळत आहेत. शेती खरेदी-विक्री, बक्षीसपत्र मृत्युपत्र नोंदणीसाठी लाभ क्षेत्राचा दाखला बंधनकारक करताना तो केवळ आपले सरकार या ऑनलाइन पोर्टलवरूनच घेण्याची सक्ती लादण्यात आली आहे. मात्र पोर्टलवर आवश्यक माहिती व मार्गदर्शन नसल्याने व्यवहार अक्षरशः ठप्प झाले आहेत.
 
 
shetkari
 
कोणते गाव कोणत्या जलसंपदा प्रकल्पात येते, डाव्या की उजव्या कालव्यात समाविष्ट आहे, याबाबत पोर्टलवर कोणतीही अधिकृत माहिती नाही. बाब म्हणजे, विभागातील अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांनाच त्यांच्या कार्यक्षेत्रातील गाव-प्रकल्प नकाशा माहित नसल्याचे उघड झाले. आभासी अर्ज केल्यानंतर १५—ते २० दिवस कोणतीही हालचाल नाही. त्यानंतर इतर प्रकल्प निवडा असा एका ओळीतला शेरा देत अर्ज नाकारला जातो. योग्य प्रकल्प कोणता, याचे साधे मार्गदर्शनही दिले जात नाही. यामुळे वेळ, पैसा व वाया जात आहे.
 
Water Resources Project  मुलीच्या लग्नासाठी, दवाखान्याच्या खर्चासाठी किंवा तातडीच्या गरजेसाठी शेती व्यवहार करायचा असताना हा दाखला अडथळा ठरत आहे. मदत करण्याऐवजी यंत्रणा अडथळे निर्माण करत असल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव‘ संताप उसळला आहे. यवतमाळ व आर्णी येथील अधिकार्‍यांशी अनेकदा चर्चा करूनही ठोस माहिती किंवा उपाय मिळाला नाही. उन्हाळ्याच्या कडक उकाड्यात शेतकर्‍यांना उंबरठे झिजवावे लागत आहेत‡ही परिस्थिती संतापजनक आहे.
याबाबत निम्न पैनगंगा प्रकल्पचे कार्यकारी अभियंता विलास बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, आमच्या संकेतस्थळावर योग्य माहिती टाकून अद्ययावत करू आणि आमच्या कर्मचारी वर्गालाही या विषयी सांगू. तसेच, शेतकर्‍यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तातडीने उपाय योजना करू.

जलसंपदा विभागाने तत्काळ गावनिहाय प्रकल्प व कालवा (डावा/उजवा) यांची स्पष्ट, अधिकृत माहिती पोर्टलवर जाहीर करावी, अर्ज नाकारताना सविस्तर कारणे व योग्य मार्गदर्शन देणे बंधनकारक करावे, प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी, अन्यथा शेतकरी संघटनांच्या वतीने तीव‘ आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.