Agricultural Produce Market Committee कृषी उत्पन्न बाजार समिती, अंजनगाव सुर्जी येथील १७ संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी अपात्र घोषित केले होते. त्या आदेशाला राज्याच्या पणन मंत्रालयाने स्थगिती दिली आहे. १९ मे रोजी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी हा स्थगिती आदेश दिल्याने संचालक मंडळाला दिलासा मिळाला आहे. २४ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधकांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती नियम २०१७ च्या १०(१) (आय) नुसार अंजनगाव सुर्जी बाजार समितीच्या सर्व १७ संचालकांना अपात्र घोषित केले होते. या कारवाईमुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती, तर भाजपच्या सहकारातील सत्तेला धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली होती.
Agricultural Produce Market Committee विरोधकांनी पुढील कायदेशीर पावले उचलत विभागीय सहनिबंधक कार्यालयात कॅव्हेट दाखल केले होते. मात्र, सभापती अॅड. जयंत साबळे यांनी थेट मंत्रालय स्तरावर अपात्रतेच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले. ८ मे रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री जयकुमार रावल यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी अर्जदार संचालक, जिल्हा उपनिबंधक, तसेच शरद साबळे, विनायक वाघ, सुधीर अढाऊ या प्रतिवादींना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पणन मंत्र्यांनी १९ मे रोजी जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला स्थगिती दिली. आदेशात जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयावर ताशेरेही ओढण्यात आले