मुंबईत पावसामुळे उकाड्यापासून दिलासा

विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम

    दिनांक :22-May-2026
Total Views |
मुंबई
Mumbai rain update राज्यातील हवामानात सध्या मोठी तफावत पाहायला मिळत असून मुंबईसह कोकण भागात अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत वेगवेगळ्या हवामान परिस्थितीचा इशारा दिला आहे.पुण्यातही पावसाची दमदार सुरुवात झाली. 
 

Mumbai rain update 
मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी आणि वाढलेली आर्द्रता अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी दमट वातावरणामुळे नागरिकांना उकाड्याचाही सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टी भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
 
 
दुसरीकडे विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरूच आहे. काही ठिकाणी तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर Mumbai rain update उष्णतेशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचाव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या कामगारांनी अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.दरम्यान, राज्यात मान्सूनपूर्व वातावरण सक्रिय होत असल्याने काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र विदर्भातील उष्णतेपासून तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे