रांची
IAS transfer झारखंड सरकारने राज्य प्रशासनात व्यापक फेरबदल करत ३६ भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुनर्नियुक्त्या आणि अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. कार्मिक विभागाने याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली असून, राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
या फेरबदलाचा भाग म्हणून राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये नवीन उपायुक्तांची (डीसी) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दीर्घकाळ नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या १२ आयएएस अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रशासनिक कामकाजाचा वेग वाढवणे, विभागीय समन्वय सुधारणा करणे आणि विकास योजनांच्या अंमलबजावणीला गती देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
गरवा जिल्ह्यात २०१४ बॅचचे आयएएस IAS transfer अधिकारी पशुपतिनाथ मिश्रा यांची नवीन उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते त्याच जिल्ह्यात उपविकास आयुक्त (डीडीसी) म्हणून कार्यरत होते. खुंटी जिल्ह्याच्या उपायुक्तपदी २०१९ बॅचचे आयएएस अधिकारी जावेद हुसेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर खुंटीचे विद्यमान उपायुक्त सौरभ कुमार भुवानिया यांची देवघर जिल्ह्याच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रशासकीय संरचनेतही मोठे बदल करण्यात आले आहेत. छवी रंजन यांची क्रीडा व युवा व्यवहार विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. झीशान कमर यांना पेयजल व स्वच्छता विभागात विशेष सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. २०१३ बॅचचे आयएएस अधिकारी सुनील कुमार सिंग यांची माहिती तंत्रज्ञान विभागात विशेष सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान, भोर सिंग यादव यांची कृषी विभागातून बदली करून त्यांची वन व पर्यावरण विभागात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०१५ बॅचच्या आयएएस अधिकारी अनन्या मित्तल, ज्यांनी यापूर्वी गरवा जिल्ह्याच्या उपायुक्तपदी काम पाहिले आहे, त्यांना झारखंड राज्य उपजीविका प्रोत्साहन सोसायटी (JSLPS) च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. ग्रामीण विकास व उपजीविका कार्यक्रमांना बळकटी देण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
याशिवाय नमन प्रियेश लकडा IAS transfer यांची पर्यटन विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर सत्येंद्र कुमार यांना पेयजल व स्वच्छता विभागात अतिरिक्त सचिव म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या व्यापक प्रशासकीय फेरबदलामुळे जिल्हा व विभागीय पातळीवरील कामकाज अधिक गतीमान होईल, तसेच विकास योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात नव्याने नियुक्त अधिकारी आपल्या कार्यभारातून प्रशासनात अधिक परिणामकारक बदल घडवतील, असा विश्वासही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.