देशभरात मेघगर्जना, वादळे आणि मुसळधार पावसाचा इशारा

    दिनांक :24-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
IMD weather forecast India देशात तीव्र उष्णतेच्या लाटांमध्ये मान्सूनचा वेग वाढत असून हवामानातील मोठ्या बदलांची चिन्हे स्पष्ट होत आहेत. भारतीय हवामान विभागने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार जम्मू-काश्मीरपासून केरळपर्यंत आणि गुजरातपासून ईशान्य भारतापर्यंत बहुतांश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुढील काही दिवसांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 

IMD weather forecast India  
हवामान विभागाच्या अंदाजानुसार केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आजपासूनच मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये मान्सूनची सक्रियता अधिक तीव्र होत असल्याने स्थानिक प्रशासनांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.देशाची राजधानी दिल्लीमध्ये मात्र उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २४ मे रोजी दिल्लीत आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असले तरी काही भागांत उष्णतेची लाट कायम राहू शकते. २५ मे रोजी मात्र मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून हवामान काहीसे आल्हाददायक होण्याची शक्यता आहे.उत्तर प्रदेशात उष्णतेचा प्रभाव तीव्र राहणार असून पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागांमध्ये २९ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. लखनौ, कानपूर, प्रयागराज, आग्रा आणि वाराणसी यांसारख्या शहरांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ, शामली, बुलंदशहर आणि सहारनपूर परिसरात मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता असल्याने हवामानात अस्थिरता जाणवणार आहे.
 
बिहारमध्ये हवामान मिश्र IMD weather forecast India स्वरूपाचे राहण्याची शक्यता असून पाटणा, गया, मुझफ्फरपूर आणि भागलपूरसह अनेक जिल्ह्यांत आज जोरदार मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. २५ आणि २६ मे रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून २८ आणि २९ मे दरम्यानही पावसाचे सत्र कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पंजाबमध्ये मात्र उष्णतेची लाट कायम राहणार असून अमृतसर, लुधियाना, पटियाला आणि चंदीगड येथे तीव्र उष्णतेचा प्रभाव २९ मे पर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे. तथापि, महिन्याच्या अखेरीस काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसामुळे हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
डोंगराळ राज्यांमध्येही हवामान अस्थिर राहणार आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मनाली आणि धर्मशाळा येथे २९ मे पर्यंत मेघगर्जनेसह वादळ आणि जोरदार वाऱ्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये २५ मे रोजी डेहराडून, नैनिताल आणि हरिद्वार परिसरात गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर, जम्मू आणि पहलगाम येथे २४ व २५ मे रोजी मेघगर्जना आणि वाऱ्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे.झारखंडमध्येही हवामानाची स्थिती चिंताजनक राहणार असून रांची, जमशेदपूर आणि धनबाद येथे आज आणि उद्या तीव्र मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २६ ते २९ मे दरम्यान राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
एकूणच देशभरात उष्णतेची लाट आणि मान्सूनची सक्रियता यांचा संगम दिसून येत असून पुढील काही दिवस हवामान अत्यंत बदलते आणि काही ठिकाणी धोकादायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.