- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचे उद्घाटन
नागपूर,
Warehouse Logistics Park सध्याची आंतरराष्ट्रीय पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. मात्र, ज्या वेळी संधी निर्माण होतात, त्याच वेळी नवीन आव्हानेही समोर उभी राहतात. लॉजिस्टीक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढील सर्वात मोठे आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचे असेल, तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणे अत्यावश्यक प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
Warehouse Logistics Park गोदाम लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने अमरावती मार्गावरील गोंडखैरी येथे उभारण्यात आलेल्या गोदाम लॉजिस्टिक्स पार्कच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी प्रामुख्याने केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आ. आशिष देशमुख, परिणय फुके, गोदाम लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक महावीर के. के. गुप्ता, राजन अग्रवाल, कृष्णकुमार गुप्ता, हल्दीरामचे शिवकिसन अग्रवाल आदी उपस्थित होते.
लॉजिस्टिक्समुळे आर्थिक विकास
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नागपूर व गडचिरोली भागातही आता उद्योग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. त्यामुळे लॉजिस्टीक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. सध्याची स्थिती पाहता आणखी कितीतरी प्रमाणात लॉजिस्टीक्सच्या व्यवस्थेत वाढ गरज निर्माण होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून गोदाम लॉजिस्टिक्स हा नागपूरच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
ईलेक्ट्रिक वाहनामुळे लॉजिस्टिक्सवरील खर्च कमी होईल
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
मालवाहतुकीत ईलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यास खर्चात बचतीसह पर्यावरणालाही मदत होईल. आणि पर्यायाने लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी करता येईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. आपल्या प्रस्ताविकात महावीर जैन यांनी गोदाम लॉजिस्टिक्स पार्कबाबत माहिती दिली.
गोदाम पार्कमध्ये सहाशे कोटींची गुंतवणूक
मध्य भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक औद्योगिक लॉजिस्टिक्स पार्कपैकी असा हा पार्क तब्बल २५ लाख चौरस फुटाच्या दर्जेदार ‘वर्ग अ’ गोदाम क्षमतेसह सुमारे १०५ एकर जागेत उभारण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे संचालित स्मार्ट वेअर हाऊसिंगची अत्याधुनिक सुविधा या प्रकल्पात समाविष्ट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात सुमारे १५ हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. आणि समृद्धी महामार्गाशी धोरणात्मकदृष्ट्या जोडण्यात आलेला हा महत्त्वाचा लॉजिस्टिक प्रकल्प आहे. या प्रकल्पात सुमारे सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून प्रकल्पात सौर उर्जा संयंत्राचा समावेश करण्यात आला आहे.