इबोला व्हायरस जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित

भारत अलर्टवर, काँगोमध्ये २० दिवसांत २०० लोकांचा मृत्यू

    दिनांक :25-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
Ebola Virus वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ने इबोला व्हायरसला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. त्यानंतर भारत सरकारनेही सतर्कता वाढवली आहे. विशेषतः कांगो, युगांडा आणि सुदानला प्रवास करणाèयांना सावध राहण्यास सांगितले आहे. सरकारने म्हटले आहे की, या देशांतून परत येणाèया लोकांना ताप, अशक्तपणा, उलट्या, जुलाब, घसा दुखणे किंवा अंगदुखी यांसारखी लक्षणे जाणवल्यास त्यांनी त्वरित डॉक्टरांना कळवावे. विमानतळांवरही तपासणी वाढवण्यात आली आहे. कांगोमध्ये गेल्या 20 दिवसांत सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. तेथे इबोलाची भीती इतकी वाढली आहे की सॅनिटायझर आणि मास्कच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. रुग्णालयांवरही ताण वाढत आहे.
 ebola india 
 
Ebola Virus अमेरिकेने कांगो, युगांडा आणि रवांडाहून येणाèया प्रवाशांची विमानतळांवर तपासणी सुरू केली आहे. प्रवाशांकडून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली जात आहे. चीननेही इबोलाबद्दल इशारा जारी केला आहे. आफ्रिकन देशांतून येणाèया प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे.
 
Ebola Virus जपानने इबोलाबाबत प्रवासाचा धोका असल्याचा इशारा जारी केला आहे. विमानतळांवर स्क्रीनिंग आणि वैद्यकीय तपासणी अधिक मजबूत करण्यात आली आहे. फ्रान्सनेही विमानतळांवरील पाळत वाढवली आहे. प्रवाशांची तपासणी आणि रुग्णालयांची तयारी अधिक मजबूत केली जात आहे.
Ebola Virus जगभरात इबोला व्हायरस डिसीजने ग्रस्त असलेल्या रुग्णांपैकी 25 ते 90 टक्के लोकांचा मृत्यू होतो. इबोला व्हायरस पहिल्यांदा 1976 मध्ये आफ्रिकेत समोर आला होता. त्यावेळी सुदान आणि तत्कालीन झैरे (आता डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो) मध्ये याची प्रकरणे आढळली होती.