मृत्यूचा टॉवर! खाली पडून एकाचा अंत

दोघांना वायुसेनेने हेलिकॉप्टरने वाचवले

    दिनांक :03-May-2026
Total Views |
उत्तर प्रदेश
Siddharthnagar accident उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात एका जुना व जीर्ण पाण्याच्या टॉवरवर घडलेल्या धक्कादायक घटनेत एक मुलाचा मृत्यू झाला असून दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. टॉवरवर अडकून पडलेल्या दोन मुलांना वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षितरीत्या खाली उतरवण्यात आले. या संपूर्ण बचाव मोहिमेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
 

Siddharthnagar accident, Uttar Pradesh water tank collapse 
ही घटना सिद्धार्थनगर शहरातील कांशीराम कॉलनी परिसरात घडली. शनिवारी पाच मुले सुमारे 30 वर्षे जुना आणि जीर्ण झालेल्या पाण्याच्या टॉवरवर चढली होती. खाली उतरत असताना टॉवरची जीर्ण सीढी अचानक कोसळली. त्यामुळे पाचही मुलांमध्ये मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या अपघातात तीन मुले खाली पडली, तर दोन मुले टॉवरवरच अडकून राहिली.खाली पडलेल्या मुलांमध्ये गोलू (12), सनी (14) आणि सिद्धार्थ (10) यांचा समावेश होता. त्यांना तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सिद्धार्थला डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरित दोन्ही मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोरखपूर येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
 
 
दरम्यान, टॉवरवर अडकून Siddharthnagar accident राहिलेल्या पवन (14) आणि शाबान (12) या दोन मुलांना खाली उतरवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सुरुवातीला पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. मात्र सततच्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने गोरखपूर येथून वायुसेनेचे हेलिकॉप्टर मागवले.रविवारी पहाटे सुमारे 5 वाजून 20 मिनिटांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने अत्यंत कठीण परिस्थितीत दोन्ही मुलांना सुरक्षितरीत्या खाली उतरवण्यात आले. संपूर्ण बचाव मोहिमेदरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री कार्यालय आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधून तातडीने वायुसेनेची मदत घेण्यात आली. जलद आणि प्रभावी समन्वयामुळे ही बचाव मोहीम यशस्वी झाली असून मोठा अनर्थ टळला आहे.या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून जीर्ण अवस्थेतील सार्वजनिक संरचनांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.