महिला विषयावर बोलण्याचा राहुल गांधींना अधिकारच नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

    दिनांक :04-May-2026
Total Views |
नागपूर,
rahul gandhi महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूर होणार होते. मात्र डीएमके, एनसीपी (शप), समाजवादी, शिवसेना उबाठा, काँग्रेस यांनी महिलाविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन केले. त्यामुळे आता काँग्रेसचे नेते राहुल गांधींना महिला आरक्षणावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
 
 
rahul gandhi
 
 
प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, उत्तर आणि दक्षिण वाद संपवण्याचे प्रयत्न महिला आरक्षण विधेयकात होते. मात्र लोकशाहीत महिला आरक्षण देण्यास विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला आहेत.rahul gandhi काँग्रेस आणि विरोधकांनी सातत्याने महिला विरोधी धोरण अवलंबले आहे.