बालासोर,
marriage proposal came to life ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका साध्या प्रेमप्रस्तावाने एका तरुणाचा जीव घेतला. सिमुलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तमपूर पंचायतीचा रहिवासी असलेल्या सुभाष सुतारने कांचपाडा पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या बिरब्रह्मपूर गावातील एका मुलीला फोनवरून लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. जेव्हा मुलीचे वडील भगवान कर यांना ही गोष्ट कळली, तेव्हा या प्रकरणाने अचानक गंभीर वळण घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील भगवान कर यांनी कसेतरी सुभाषला आपल्या घरी बोलावले आणि नंतर त्याला एका वाहनातून बिरब्रह्मपूर गावात आणले. यानंतर जे घडले ते अत्यंत क्रूर आणि अमावीनय होते.
खांबाला बांधून मारहाण
असा आरोप आहे की, बीरब्रह्मपूर शाळेच्या आवारातील गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये सुभाषला एका खांबाला बांधण्यात आले. त्यानंतर त्याला निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. marriage proposal came to life तो गंभीर जखमी झाला आणि त्याची प्रकृती चिंताजनक होती.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सुभाषची सुटका करण्यात आली आणि त्याला तात्काळ सिमुलिया रुग्णालयात नेण्यात आले. marriage proposal came to life मात्र, त्याची प्रकृती खालावत गेल्याने त्याला भद्रक रुग्णालयात हलवण्यात आले. भद्रक रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांचे निवेदन
सिमुलिया पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी देवराज जेना म्हणाले, "मृत तरुणाच्या मेहुण्याने आज सकाळी हत्येची तक्रार दाखल केली आहे. प्रेमप्रकरण आणि प्रस्तावासंदर्भात मुलीचे वडील आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध हत्येची तक्रार आधीच दाखल करण्यात आली आहे. तपास सुरू असून लवकरच कारवाई केली जाईल." marriage proposal came to life सिमुलिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.