खंबाटकी घाटाला ‘स्मार्ट टनेल’ची भेट

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
पुणे
Khambatki Ghat पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवासी आणि पर्यटकांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. महामार्गावरील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू ठरलेल्या खंबाटकी घाटातील प्रवास आता अधिक सुलभ होणार असून, नवीन खंबाटकी बोगदा लवकरच सर्वसामान्यांसाठी अधिकृतपणे खुला केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे-सातारा दरम्यानचा प्रवास केवळ जलदच नव्हे तर अधिक सुरक्षित होणार असल्याचे मानले जात आहे.
 

Khambatki Ghat tunnel, Pune Satara highway tunnel, 
सध्या हा नवा बोगदा चाचणी स्वरूपात खुला करण्यात आला असून, लवकरच त्याचे औपचारिक लोकार्पण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) विकसित केलेल्या या सहापदरी बोगद्यामुळे घाटातील अरुंद रस्ता आणि तीव्र वळणांमुळे होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.पूर्वी खंबाटकी घाट पार करण्यासाठी प्रवाशांना साधारण ४५ मिनिटांचा वेळ लागत असे. मात्र नवीन बोगदा कार्यान्वित झाल्यानंतर हा प्रवास केवळ १० ते १५ मिनिटांमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिणामी, प्रवाशांचा ३० ते ४० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.जुना खंबाटकी बोगदा दोनपदरी असल्यामुळे वाहन बिघाड किंवा अपघात झाल्यास संपूर्ण घाटात लांबच लांब रांगा लागण्याची समस्या वारंवार निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर तयार Khambatki Ghat करण्यात आलेला नवीन बोगदा अधिक रुंद आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मोठी मदत होणार आहे.सुरक्षेच्या दृष्टीनेही या बोगद्यात अत्याधुनिक व्यवस्था करण्यात आली आहे. हाय-टेक प्रकाशयोजना, सुधारित रिफ्लेक्टर्स, २४ तास कार्यरत सीसीटीव्ही निगराणी प्रणाली तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी सुसज्ज अग्निशमन यंत्रणा यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय महामार्गावर उभारण्यात येणारे भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल प्रकल्पही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
खंबाटकी घाट हा पुणे-सातारा मार्गाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून, कोल्हापूर, बेळगाव यांसारख्या शहरांना जोडणारा प्रमुख दुवा मानला जातो. तसेच महाबळेश्वर, पाचगणी आणि कास पठार यांसारख्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठीही हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.
नवीन बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या संपूर्ण पट्ट्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित असून, प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कोंडीमुक्त होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.