तीन महिन्यांपासून स्वच्छतेचा बोजवारा

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
नाली सफाईअभावी नागरिक त्रस्त
 
सेलू, 
Selu Nagar Panchayat शहरातील १, ११, १२ व १३ या प्रभागांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून नियमित स्वच्छता व नाली सफाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यत होत आहे. नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अनेक भागांतील नाल्या तुंबल्या असून साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 

selu 
 
शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्त्यांच्या कडेला कचर्‍याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. नाल्यांमधील गाळ काढला जात नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शयता व्यत केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करूनही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे. स्वच्छता कर्मचार्‍यांची अपुरी उपस्थिती आणि नियोजनाचा अभाव यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
 
 

कर आकारणी नियमितपणे केली जाते, मात्र मूलभूत सुविधा पुरविण्यात नगरपंचायत अपयशी ठरत आहे. नाली सफाई आणि स्वच्छतेच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची तातडीने सफाई करून स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यत केली जात आहे. नगरपंचायत प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.