मोठा राजकीय 'भूकंप' होणार

"ऑपरेशन टायगर’वरून वातावरण तापले

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
मुंबई
Operation Tiger महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसत असून ‘ऑपरेशन टायगर’ या नावाने चर्चेत आलेल्या संभाव्य राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहेत. मात्र, या सर्व दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
 

Operation Tiger Maharashtra politics, Shiv Sena UBT faction crisis 
काय झाले असे?
दरम्यान, रविवारी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षातील सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला एकूण नऊ खासदारांपैकी केवळ चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याचे सांगितले जात आहे, तर उर्वरित पाच खासदार ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले. या बैठकीनंतर पक्षांतर्गत अस्वस्थता आणि संभाव्य राजकीय बदलांबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
 
 
राजकीय वर्तुळात असा Operation Tiger दावा केला जात आहे की, काही खासदारांनी पक्ष बदलण्याच्या शक्यतेबाबत आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांशीही संवाद साधल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शिंदे गटात गेल्यास राजकीय आणि संघटनात्मक परिणाम काय होऊ शकतात याची चाचपणी करण्यात आल्याच्या चर्चाही रंगत आहेत. विशेषतः मराठवाडा भागातील काही खासदार या हालचालींच्या केंद्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.या पार्श्वभूमीवर जून महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी घडामोड घडू शकते, अशी चर्चा राजकीय विश्लेषकांमध्येही सुरू आहे. २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात मोठा राजकीय बदल झाला होता. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरच पुन्हा एकदा जून महिन्यात संभाव्य राजकीय ‘भूकंपा’ची चर्चा रंगू लागली आहे.
 
 
दरम्यान, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चाही सुरू असून त्याआधी राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा या राजकीय वर्तुळातील अंदाज आणि दाव्यांवर आधारित असून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये वाढत्या हालचालींमुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.