उद्धव ठाकरे यांना '२४ व्होल्टचा' झटका

खासदार फुटण्याची दाट शक्यता

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Uddhav Thackeray राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या हालचालींना वेग आला असून “ऑपरेशन टायगर” या मोहिमेमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मधील अंतर्गत समीकरणे बदलत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ठाकरेंच्या काही खासदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आपल्या सर्व खासदारांची तातडीची बैठक घेतली होती.
 

Shiv Sena UBT political crisis, Operation Tiger Maharashtra politics, Uddhav Thackeray MPs meeting  
या घडामोडींनंतर ठाकरेंच्या गोटात अस्वस्थता वाढल्याचे चित्र असून काही खासदार वेगळा गट स्थापन करू शकतात, अशी शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. काल झालेल्या बैठकीनंतर मात्र ठाकरे गटाकडून सर्व खासदार पक्षासोबतच असल्याचा ठाम दावा करण्यात आला होता. “ऑपरेशन टायगर काहीही नाही, उलट आम्हीच ‘ऑपरेशन लांडगा’ सुरू करू,” असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, या सर्व चर्चांदरम्यान ठाकरेंच्या काही खासदारांनी दिल्लीत हालचाली वाढवल्याची माहिती समोर आली आहे. काही खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या तयारीत असल्याचे तसेच ते स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत हालचाली करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर काही खासदारांनी शिंदे गटातील केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याची माहितीही पुढे येत आहे.
या घडामोडींमुळे Uddhav Thackeray  राजकीय वातावरण तापले असून दिल्लीतील हालचाली लक्षात घेता खासदार संजय राऊत हे तातडीने दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. पक्षात संभाव्य फूट रोखण्यासाठी तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, १४ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला पाच खासदार अनुपस्थित राहिल्यानेही चर्चांना अधिक उधाण आले आहे. या अनुपस्थितीमुळे पक्षांतर्गत नाराजी किंवा वेगळ्या भूमिकेची शक्यता अधिक बळकट झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.एकूणच, “ऑपरेशन टायगर” आणि त्याला मिळालेल्या राजकीय प्रतिसादामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मध्ये अंतर्गत हालचाली तीव्र झाल्याचे चित्र असून आगामी काळात याचे परिणाम लोकसभा आणि राज्यातील राजकारणावर दिसू शकतात, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.