वैभवला ‘नो एंट्री’ श्रेयसच्या निर्णयाची चर्चा!

    दिनांक :26-Jun-2026
Total Views |
बेलफास्ट,
shreyass decision sparks discussion भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यापूर्वी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची जोरदार चर्चा होती. अनेक क्रिकेटप्रेमींना या सामन्यात वैभवला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, सामन्याच्या नाणेफेकीवेळी भारतीय संघाचा नवा कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्ट केले की, वैभव सूर्यवंशी या सामन्यात अंतिम अकरामध्ये नाही.
 
shreyass decision sparks discussion
 
यामुळे वैभवच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने अनुभवी आणि संतुलित संघावर विश्वास दाखवला आहे. श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार श्रेयस अय्यरने सामन्यापूर्वी बोलताना सांगितले की, वैभवला योग्य वेळी निश्चित संधी दिली जाईल. सध्या संघाच्या संयोजनानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. संघ तीन वेगवान गोलंदाज आणि एका अष्टपैलू खेळाडूसह मैदानात उतरला असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
 
विशेष म्हणजे, या सामन्यात श्रेयस अय्यर स्वतःही भारतीय टी-२० संघाचा कर्णधार म्हणून पहिल्यांदाच मैदानात उतरला. दीर्घ कालावधीनंतर टी-२० संघात पुनरागमन करत त्याच्याकडे नेतृत्वाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतीय संघाने या मालिकेत नव्या नेतृत्वाखाली दमदार सुरुवात करण्याचा निर्धार केला असून, वैभव सूर्यवंशीला पुढील सामन्यांमध्ये संधी मिळते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.