अहमदाबाद
hindu marriage गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, केवळ विवाह प्रमाणपत्र मिळाल्याने हिंदू विवाह मानला जाऊ शकत नाही. विवाह तेव्हाच मानला जाईल, जेव्हा हिंदू विवाह कायद्यानुसार ठरलेले विधी आणि परंपरा पूर्ण केल्या असतील. ज्या समुदायांमध्ये सात फेऱ्यांची परंपरा आहे, तिथे त्याशिवाय विवाह पूर्ण मानला जाणार नाही.
hindu marriage न्यायमूर्ती इलेश जे. वोरा आणि न्यायमूर्ती आर.टी. वच्छानी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, विवाह प्रमाणपत्र हे केवळ आधी झालेल्या विवाहाची नोंद असते. ते स्वतःहून कोणत्याही विवाहाला मान्यता देत नाही. हे प्रकरण ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या अपिलाशी संबंधित आहे. त्याचा आरोप आहे की, अहमदाबादमधील एका महिलेने नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून कागदपत्रांवर सह्या घेऊन बनावट पद्धतीने विवाह प्रमाणपत्र बनवले. त्या दोघांमध्ये कधीही विवाह झाला नाही.
hindu marriage महिलेनेही मान्य केले - विवाहाचे विधी झाले नाहीत
सुनावणीत महिलेने कुटुंब न्यायालयात मान्य केले की, विवाहाचा कोणताही विधी झाला नव्हता. तिने हे देखील स्वीकारले की, ते दोघे कधीही पती-पत्नी म्हणून एकत्र राहिले नाहीत. तरीही फॅमिली कोर्टाने फक्त विवाह प्रमाणपत्राच्या आधारावर व्यक्तीची याचिका फेटाळली होती. उच्च न्यायालयाने हा आदेश रद्द करत म्हटले की, लग्नाच्या आवश्यक विधीच झाल्या नाहीत, तेव्हा केवळ नोंदणीच्या आधारावर त्याला हिंदू विवाह मानले जाऊ शकत नाही.
hindu marriage लग्न केवळ कायदेशीर औपचारिकता नाही
उच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम-७ चा संदर्भ देत म्हटले की, हिंदू विवाह तेव्हाच वैध मानला जाईल, जेव्हा कायदा आणि संबंधित समुदायाच्या परंपरेनुसार आवश्यक विधी पूर्ण केले जातील.
न्यायालयाने म्हटले की, हिंदू परंपरेत विवाह ही केवळ कायदेशीर औपचारिकता नाही, तर एक संस्कार आहे. हे दोन व्यक्तींसोबत एका नवीन कुटुंबाच्या सुरुवातीचा आधार देखील आहे. त्यामुळे विवाहाचे महत्त्व आणि त्याच्या जबाबदाऱ्या समजूनच या नात्यात प्रवेश केला पाहिजे.