मोडकळीस आलेल्या शाळेची भन्नाट गोष्ट

‘आदर्श बाल विद्यालय’ 24 जुलैपासून प्राइम व्हिडिओवर

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
मुंबई
adarsh bal vidyalaya भारतातील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लोकप्रिय असलेल्या प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी प्राइम ओरिजिनल मालिका ‘आदर्श बाल विद्यालय’चा जागतिक प्रीमियर 24 जुलै रोजी होणार असल्याची घोषणा केली आहे. हिमांक गौर यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले असून पोशम पा पिक्चर्सच्या बॅनरखाली बिस्वपती सरकार आणि समीर सक्सेना यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून निर्मितीची धुरा सांभाळली आहे. सात भागांच्या या कॉमेडी मालिकेची कथा बिस्वपती सरकार, अक्षय अस्थाना, नूपुर पाई, तत्सत पांडे आणि मेघना श्रीवास्तव यांनी लिहिली आहे. के. के. मेनन मुख्य भूमिकेत झळकणार असून अर्चना पूरण सिंह, नवीन कस्तुरिया, प्रसन्ना बिष्ट, अभिमन्यु सिंह, देवेन भोजानी, अजितेश गुप्ता, अन्नपूर्णा सोनी आणि प्राची शाह यांच्याही या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही मालिका 24 जुलैपासून भारतासह जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये केवळ प्राइम व्हिडिओवर हिंदी भाषेत इंग्रजी सबटायटल्ससह प्रदर्शित होणार आहे.
 

adarsh bal vidyalaya 
‘आदर्श बाल विद्यालय’ची कथा एका मोडकळीस आलेल्या शाळेभोवती फिरते. या शाळेचे बेफिकीर पण मनमिळावू मुख्याध्यापक ज्ञानेश्वर त्रिपाठी (के. के. मेनन) यांना केंब्रिज येथे होणाऱ्या प्रतिष्ठित सरकारी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळवायची असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते आपल्या शाळेचे रूप पालटण्याच्या अनोख्या प्रवासाला सुरुवात करतात. शहरातील सर्वाधिक मागासलेल्या शाळांपैकी एका शाळेचे भविष्य बदलण्याच्या उद्देशाने ते शिक्षकांची एक भन्नाट टीम उभी करतात. मात्र, वर्गातील गोंधळ घालणारी मुले, अपुरी संसाधने, पालकांची उदासीनता आणि प्रशासकीय अडचणी अशा अनेक आव्हानांचा त्यांना सामना करावा लागतो. विनोद आणि भावनिक क्षणांचा सुरेख मिलाफ असलेली ही मालिका दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या संस्थेलाही नवसंजीवनी मिळू शकते, हा आशावादी संदेश देते.
 
 
या मालिकेबाबत प्राइम व्हिडिओ adarsh bal vidyalaya इंडियाचे डायरेक्टर आणि ओरिजिनल्स विभागाचे प्रमुख निखिल मधोक म्हणाले, “आदर्श बाल विद्यालय ही एक उत्साहवर्धक आणि मनोरंजक कॉमेडी मालिका आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेतील अनेक त्रुटी आणि त्यावर आपल्या परीने मात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची ही कथा आहे. ही मालिका विनोदी, हृदयस्पर्शी आणि प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आहे. बिस्वपती सरकार, समीर सक्सेना, हिमांक गौर आणि संपूर्ण टीमने आपल्या सर्जनशील दृष्टिकोनातून ही कथा अत्यंत सुंदरपणे साकारली आहे. 24 जुलैला प्राइम व्हिडिओवर तिचा प्रीमियर होऊन भारतासह जगभरातील प्रेक्षकांसमोर ती सादर होणार असल्याची आम्हाला उत्सुकता आहे.”
मालिकेचे सहनिर्माते आणि adarsh bal vidyalaya एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर्स बिस्वपती सरकार आणि समीर सक्सेना यांनी सांगितले, “या मालिकेची सुरुवात एका साध्या कल्पनेतून झाली होती—अशा शाळेची कथा सांगायची जी प्रत्येक निकषावर अपयशी वाटते, पण तरीही तिथे रोज येणाऱ्या काही जिद्दी लोकांच्या प्रयत्नांमुळे उभी आहे. या मालिकेत एका मोडकळीस आलेल्या शाळेतील विनोदी प्रसंग, गोंधळलेले वास्तव आणि दैनंदिन संघर्ष दाखवण्यात आले आहेत. त्याचबरोबर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातं, त्यांचा संघर्ष आणि एकमेकांना दिलेली साथही प्रभावीपणे मांडली आहे. ज्ञानेश्वर हे या मालिकेतील सर्वात वेगळे आणि महत्त्वाचे पात्र आहे. त्याचा प्रवास जितका मजेशीर आहे तितकाच भावनिकही आहे, आणि के. के. मेनन यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने या भूमिकेला जिवंत केले आहे. हिमांक, आमचे लेखक आणि संपूर्ण टीमसोबत ही दुनिया पडद्यावर उभी करण्याचा अनुभव अत्यंत समाधानकारक होता.”