'बैंड बजा दी यार तूने तो' घटस्फोट होणार की नाही?

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
मुंबई
akanksha chamola ‘लॉक अप 2’ या रिअॅलिटी शोमध्ये सध्या अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. या शोच्या एका भागात प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना सहभागी झाला होता. यावेळी पत्नी आकांक्षा चमोलाने घटस्फोटाची घोषणा केल्याच्या मुद्द्यावर त्याने नाराजी व्यक्त केली. मात्र, या चर्चेदरम्यान गौरवने आपल्या नात्याबाबतची भूमिका स्पष्ट करत संयमाने परिस्थिती हाताळली.
 

akanksha chamola 
गौरवने आकांक्षाला स्पष्टपणे सांगितले की, “आपण या विषयावर फक्त आपापसातच चर्चा केली आहे. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर अजून कोणत्याही न्यायालयात सह्या झालेल्या नाहीत आणि आपला घटस्फोट कायदेशीररित्या अंतिम झालेला नाही.” यावर आकांक्षाने सांगितले की, गौरव ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होणार होता, त्यावेळी तिने हा निर्णय घेतला होता.आकांक्षाचे म्हणणे मध्येच थांबवत गौरव म्हणाला, “तू शोमध्ये जाण्याच्या अवघ्या सात दिवस आधी माझ्यासाठी ही मोठी अडचण निर्माण केली आहेस. शांत डोक्याने विचार कर. अशा परिस्थितीत कोणी काय करेल? मी तिथे जाऊन माझ्या धोकादायक स्टंटवर लक्ष केंद्रित करू की माझ्या मनात सुरू असलेल्या प्रचंड गोंधळाला हाताळू? एकाच वेळी दोन्ही गोष्टी सांभाळणे माझ्यासाठी खूप कठीण होते.”
 
 
यानंतर गौरवने सांगितले की, “त्या घटनेला आता बराच काळ लोटला आहे. त्यावेळी आमच्यात जे काही घडलं होतं, आम्ही त्यातून पुढे निघून गेलो आहोत.” यानंतर शोच्या होस्ट फराह खानने गौरव आणि आकांक्षाला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी तिची केबिन दिली. केबिनमध्ये गेल्यानंतर गौरवने आकांक्षाशी मनमोकळेपणाने चर्चा केली.
 
 
गौरव म्हणाला, “मे महिन्यात, जेव्हा मी माझ्या akanksha chamola  नवीन शोसाठी निघत होतो, तेव्हा याबद्दल बोललो होतो. पण आता बाहेरच्या लोकांना असं वाटतंय की जणू काही आमचा वर्षभरापूर्वीच घटस्फोट झाला आहे. लोक वाट्टेल ते तर्कवितर्क लावत आहेत.”आकांक्षाशी बोलताना गौरवने सोशल मीडिया आणि बाहेरील चर्चांबाबतही नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “बाहेरचे लोक वाट्टेल ते तर्कवितर्क लावत आहेत. लोक ज्या प्रकारे या संपूर्ण परिस्थितीकडे पाहत आहेत, ते पाहून मला खरंच धक्का बसला आहे. प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणे गोष्टी रचत आहे आणि सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर त्यांच्या मनात येईल ते लिहित आहे. अशा खोट्या दाव्यांचा सत्याशी काहीही संबंध नाही.”पुढे गौरवने आपल्या नात्याचा बचाव करत सांगितले, “लोक विचार न करता त्यांच्या नात्यावर बोट दाखवत आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल अशी विधाने केली जाऊ नयेत. तुझ्याबद्दल कोणी एक शब्दही बोललेला मी सहन करू शकत नाही. कायदेशीररित्या आपण अजूनही विवाहित आहोत आणि मी तुझा नवरा आहे. ज्या व्यक्तीसोबत मी होतो किंवा अजूनही आहे, तिच्याबद्दल कोणीही काही वाईट बोललेले मला आवडत नाही.”गौरव खन्नाने या संपूर्ण परिस्थितीत दाखवलेल्या संयमाचे आणि आपल्या नात्याबद्दल घेतलेल्या भूमिकेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अनेक प्रेक्षकांनी त्याने परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली, त्याचे समर्थन केले आहे.