नवी दिल्ली
commonwealth-games २३ जुलैपासून ग्लासगो येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारताच्या 191 सदस्यांच्या जंगी पथकाला अधिकृत मंजुरी दिली आहे. या अंतिम पथकामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे १२६ खेळाडू आणि त्यांना मदत करणारे ५१ सहाय्यक कर्मचारी (सपोर्ट स्टाफ) सामील आहेत. क्रीडा प्रकारांचा विचार करता, भारताकडून यंदा 78 पुरुष आणि ४८ महिला खेळाडू मैदानात उतरणार आहेत.
commonwealth-games मंत्रालयाने यावेळी एक महत्त्वाचा नियम स्पष्ट केला असून, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन किंवा इतर कोणत्याही क्रीडा महासंघाच्या पदाधिकाèयांच्या परदेश प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च सरकार उचलणार नाही. हे बंधन पथकाचे प्रमुख (शेफ-द-मिशन) रोहित राजपाल यांनाही लागू होणार असल्याने, त्यांना स्वतःचा खर्च स्वतः करावा लागेल. तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या ताफ्यात केवळ प्रशिक्षक, वैद्यकीय पथक आणि अत्यंत आवश्यक कर्मचाèयांचाच समावेश करण्यात आला आहे.
commonwealth-games यंदाच्या ग्लासगो दौऱ्यात भारताचे सर्वात मोठे पथक ॲथलेटिक्सचे असून, यात स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रासह एकूण 32 खेळाडूंचा समावेश आहे. या मैदानी खेळ प्रकारात १० महिला खेळाडू असून, त्यांच्या सोबतीला मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांच्या नेतृत्वाखालील सर्वात मोठा सपोर्ट स्टाफ असेल. दुसरीकडे, बॉक्सिंगमध्ये पदके जिंकण्याच्या इराद्याने १४ मुष्टियोद्धे रवाना होत आहेत. त्यांना स्वीडनचे प्रसिद्ध प्रशिक्षक सँटियागो निवा मार्गदर्शन करतील, तर त्यांच्यासोबत महिला प्रशिक्षक मंदाकिनी चानू आणि मानसिक तंदुरुस्ती तज्ज्ञ मैथिली भुप्तानी असतील. याव्यतिरिक्त, अनुभवी मीराबाई चानूच्या नेतृत्वाखाली १२ वेटलिफ्टर्स आणि ५ जलतरणपटू सहभागी होत असून, जलतरणपटूंच्या मार्गदर्शनाची जबाबदारी निहार अमीन आणि संदीप सेजवाल सांभाळणार आहेत. पॅरा-ॲथलीट्ससोबतही ४२ लोकांची मोठी सहाय्यक टीम ग्लासगोला जात आहे.
commonwealth-games आर्थिक आणि अर्थसंकल्पीय मर्यादांमुळे यंदाची ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा अत्यंत मर्यादित स्वरूपात खेळवली जात आहे. या स्पर्धेत केवळ १० मुख्य खेळ आणि ६ पॅरा-स्पोर्ट्सचा समावेश करण्यात आला आहे. भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण भारताचे पारंपरिक हुकमी एक्का असलेले नेमबाजी, हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती आणि क्रिकेट या खेळांना यंदा थेट स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. यामुळे भारताच्या एकूण पदक तालिकेत मोठी घट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडू ९ मुख्य क्रीडा प्रकारांमध्ये आणि ५ पॅरा-स्पोर्ट्समध्ये आपले नशीब आजमावतील.