मुंबई
Smriti Irani घराघरांत ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधील ‘तुलसी’ या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्मृती इराणी यांनी अभिनय क्षेत्रापासून ते भारत सरकारमधील प्रभावी नेत्या म्हणून केलेला प्रवास पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अधोरेखित झाला आहे. भारताच्या जागतिक आकांक्षा, महिला नेतृत्व आणि तंत्रज्ञान यांचा प्रभावी संगम घडवून आणत वास्तवातील प्रश्नांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि तरुणांना परिवर्तनाची नवी दिशा देणाऱ्या त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची तसेच जनसेवेप्रती असलेल्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेची दखल घेत त्यांचा फॉर्च्युनच्या ‘100 सर्वात प्रभावशाली महिला’ या प्रतिष्ठित यादीत समावेश करण्यात आला आहे.
एका बाजूला ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेद्वारे त्यांनी दूरचित्रवाणीच्या इतिहासात वेगळे स्थान निर्माण केले, तर दुसऱ्या बाजूला भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली. जवळपास एका संपूर्ण पिढीसाठी घराघरांत परिचित असलेल्या स्मृती इराणी यांनी महिला व बालविकास, अल्पसंख्याक व्यवहार, वस्त्रोद्योग, माहिती व प्रसारण तसेच मानव संसाधन विकास यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांचे नेतृत्व केले आहे. फॉर्च्युनच्या या प्रतिष्ठित यादीत त्यांचा समावेश होणे हा त्यांच्या उल्लेखनीय प्रवासाचा आणि समाजावर पडलेल्या प्रभावाचा योग्य सन्मान मानला जात आहे.
फॉर्च्युनच्या ‘100 सर्वात Smriti Irani प्रभावशाली महिला’ यादीत स्थान मिळाल्यानंतर स्मृती इराणी यांनी जगभरातील महिलांना उद्देशून विशेष संदेश दिला. त्या म्हणाल्या, “प्रत्येक महिलेसाठी माझा संदेश अगदी स्पष्ट आहे: तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहात. महिला स्वतःलाच सर्वाधिक पुढे नेतात. त्या स्वतःचे निकष ठरवतात, स्वतःसाठी उंच मानदंड निश्चित करतात आणि दररोज स्वतःशीच स्पर्धा करतात, तर उर्वरित जग त्यांच्याशी स्पर्धा करण्यात व्यस्त असते.”
संस्कृती, राजकारण आणि जागतिक चर्चांमध्ये स्मृती इराणी यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. तब्बल २५ वर्षांनंतर भारतीय दूरचित्रवाणीवर झालेल्या त्यांच्या ऐतिहासिक पुनरागमनामुळे मनोरंजन क्षेत्रात नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. हा केवळ त्यांचा कमबॅक नसून, दूरचित्रवाणी माध्यमाला त्याचा योग्य सन्मान आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरल्याचेही म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, आजही या मालिकेचा टीआरपी (TRP) अव्वल स्थानावर कायम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.