मुसळधार पावसाने पूरस्थिती... चार जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
जम्मू-काश्मीर
jammu and kashmir floods जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्यात रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत.
 

jammu and kashmir floods 2026 heavy rain triggers flood crisis in rajouri and poonch 
राजौरी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच नद्या, नाले आणि पूराचा धोका असलेल्या भागांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले असून नदीतील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
खराब हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन यापूर्वीच अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. प्रतिकूल हवामानामुळे 19 जुलै 2026 पासून पहलगाम आणि बाल्टल या दोन्ही मार्गांवरील श्री अमरनाथजी यात्रा तात्पुरती थांबविण्यात आली आहे. जम्मूमधील भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पचा व्हिडिओही समोर आला आहे. अमरनाथ यात्रेनंतर वैष्णोदेवी यात्राही स्थगित करण्यात आली आहे.
मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले, "सगळे काही संपले आहे; सर्व काही वाहून गेले आहे. आमच्याकडे जे काही होते ते पूर्णपणे नष्ट झाले आहे. एक महिला बेपत्ता आहे."
दुसऱ्या एका स्थानिक रहिवाशाने सांगितले, "मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे 200 ते 250 वाहने गायब झाली आहेत. ही घटना पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. बसस्थानकाचा तर अक्षरशः मागमूसही उरलेला नाही."
आणखी एका स्थानिक रहिवाशाने सांगितले, "पूर येण्यापूर्वी येथे किमान 300 ते 400 वाहने उभी होती आणि ती सर्व रातोरात वाहून गेली. प्रशासनाने किमान येथे शिल्लक असलेली वाहने बाहेर काढण्यासाठी जेसीबी किंवा क्रेन पाठवाव्यात, अशी आमची विनंती आहे. या कठीण काळात प्रशासनाने नागरिकांना मदत करावी. पूरस्थिती अजूनही गंभीर असून पाऊस थांबलेला नाही."
राजौरी जिल्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे धरहल नदीला आलेल्या पाण्याने ओव्हरफ्लो होऊन न्यू बस स्टँड बेला परिसरात पाणी शिरले. पार्किंग परिसरात पुराचे पाणी घुसल्याने बसस्थानकात उभी असलेली अनेक वाहने नुकसानग्रस्त झाली आहेत.