अमरनाथनंतर वैष्णोदेवी यात्राही आता स्थगित

खराब हवामानामुळे प्रशासनाचा निर्णय

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |

 

उधमपूर
vaishno-devi-yatra अमरनाथ यात्रेनंतर आता वैष्णोदेवी यात्राही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या खराब हवामानाच्या अंदाजानंतर खबरदारीचा उपाय म्हणून श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
 
vaishnodevi
 

vaishno-devi-yatra श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने यासंदर्भात अधिकृत माहिती देताना सांगितले की, खराब हवामानामुळे निर्माण होऊ शकणारी संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन तीर्थयात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. भाविकांची सुरक्षा आणि त्यांचे हित लक्षात घेऊनच हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

 
vaishno-devi-yatra सध्या प्रशासकीय अधिकारी हवामानाच्या आणि मार्गावरील परिस्थितीवर सतत बारीक लक्ष ठेवून आहेत. हवामानात सुधारणा होऊन परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल. तोपर्यंत सर्व भाविकांनी संयम राखावा आणि श्राइन बोर्डाच्या अधिकृत माध्यमांतून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे व माहितीचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे रविवारपासून श्री अमरनाथ यात्राही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पहलगाम आणि बालटाल या दोन्ही यात्रा मार्गांवर दरड कोसळण्याचा धोका असल्याने, भाविकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.