जाएं तो जाएं कैसे?…रेल्वेचा खोळंबा अन् वाहतुकीची कोंडी

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
मुंबई
mumbai heavy rains flood अनेक दिवसांपासून नागरिक आतुरतेने वाट पाहत असलेल्या पावसाचे अखेर आगमन झाले असून अविरत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील दोन दिवसांपासून शहरातील विविध भागांत पावसाची संततधार सुरू असून त्याला कुठलीही विश्रांती मिळालेली नाही. या पावसाच्या धारांनी नागरिक काही प्रमाणात सुखावले असले तरी, सततच्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम शहराच्या ‘लाईफलाइन’ मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे सेवांवरही झाला असून गाड्या उशिराने धावत आहेत.
 

mumbai heavy rains flood waterlogging local train delay orange alert maharashtra weather 
 
 
मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर पावसाचा स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. मध्य रेल्वेवरील गाड्या सुमारे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत, तर ट्रान्स हार्बर लोकल सेवाही याच प्रमाणात विलंबाने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर अप आणि डाऊन दिशेने गाड्या 10 ते 14 मिनिटे उशिराने धावत असल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. कार्यालय, शाळा आणि महाविद्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना या विलंबाचा मोठा फटका बसत आहे.
ठाण्यातही मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर दिसून येत असून ईस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहनांची गती मंदावली आहे. दृश्यमानता कमी झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. ठाणे शहरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळीही कायम असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
 
पहिल्याच जोरदार पावसात मुंबई-गोवा महामार्गाचीही दैना उडाल्याचे चित्र आहे. कोलटे परिसरात महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुसळधार पाऊस आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे प्रवास अधिकच कठीण बनला आहे.
 
 
 
 पाणी साचले
दरम्यान, मुंबईत mumbai heavy rains flood रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले असून हिंदमाता परिसरही जलमय झाला आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यामुळे भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता काहीशी कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
शहरात विविध ठिकाणी झालेल्या पावसाच्या नोंदीही समोर आल्या असून सांताक्रूझमध्ये 165.9 मिमी, जुहू विमानतळ परिसरात 164.5 मिमी, विक्रोळीमध्ये 163.0 मिमी, राम मंदिर स्टेशन परिसरात 157.0 मिमी, बांद्रा 141.5 मिमी, विद्याविहार 132.0 मिमी, सायन 115.0 मिमी, चेंबूर 99.5 मिमी, कुलाबा 99.0 मिमी आणि भायखळा परिसरात 97.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात एकूण 134 मिमी पाऊस, पूर्व उपनगरांत 164 मिमी आणि पश्चिम उपनगरांत 149 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरातही पावसाची संततधार कायम असून मध्यरात्रीनंतर काहीसा दिलासा मिळाला असला तरी सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. मागील दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे या भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. सखल भाग आणि रस्त्यांवर पाणी साचले होते, मात्र मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा झाला. तरीही आज ढगाळ वातावरणासह पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती पुन्हा बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.