मिशन सुधारची नागपुरात धडक मोहीम

३१३४ नवीन शिधापत्रिका वाढल्या

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
नागपूर,
mission sudhar केंद्राच्या 'मिशन सुधार' उपक्रमांतर्गत राज्यातून ५६ हजार ७६३ शिधापत्रिका वगळण्यात आल्या असल्या तरी नागपूर जिल्ह्यात मात्र ३ हजार १३४ नवीन शिधापत्रिकांची वाढ झाली आहे. मोफत धान्याचा लाभ पात्र लाभार्थींनाच मिळावा यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयाने गेल्या ३ महिन्यांत पडताळणी मोहीम राबवली आहे.
 

mission sudhar 
एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीत राज्यातून ५६ हजार ७६३ शिधापत्रिका वगळण्यात आल्या. त्यामुळे २ लाख ८५ हजार लोकांचे रेशन बंद झाले. मात्र याच काळात नागपूर जिल्ह्यात ३,१३४ नवीन शिधापत्रिका मंजूर झाल्या आहेत. नवीन पात्र लाभार्थींची नोंदणी झाल्याने ही वाढ झाली आहे.
'मिशन सुधार'अंतर्गत अपात्र, दुबार, मृत, स्थलांतरित आणि ६ महिने निष्क्रिय असलेल्या शिधापत्रिकांची छाननी करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेकांकडे चांगले उत्पन्न, पेन्शन, चारचाकी असूनही ते अन्त्योदय आणि प्राधान्य गटातील लाभ घेत होते. अशा प्रकरणांची तपासणी करून यादी केंद्राला पाठवण्यात आली आहे.एप्रिल २०२६ मध्ये केंद्राने सर्व राज्यांना अपात्र लाभार्थींची तालुकानिहाय यादी पाठवली होती. त्यानुसार नागपूर जिल्हा पुरवठा कार्यालयाने प्रत्येक तालुक्यातील शिधावाटप केंद्रांवर आधार पडताळणी, ई-केवायसी आणि घरपोच तपासणी केली.
 
 
पात्र लाभार्थींनाच मिळणार लाभ : अधिकारी
जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणाले, मोफत धान्याचा उद्देश गरजूंना मदत करणे आहे. अपात्र लोकांचा लाभ बंद करून खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचवणे हेच मिशन सुधारचे उद्दिष्ट आहे. नागपुरात नवीन पात्र कुटुंबे जोडली गेली आहेत, ही चांगली बाब आहे.
 
 
 
 
नागपूरचा आकडा
-राज्यात ५६,७६३ शिधापत्रिका वगळल्या
- ३,१३४ शिधापत्रिकांची नागपुरात वाढ
-कारण : नवीन पात्र लाभार्थी जोडले
-उद्दिष्ट : काळाबाजार रोखणे, पात्रांनाच धान्य
वगळण्याची कारणे
अपात्र - जास्त उत्पन्न / चारचाकी
दुबार - एका कुटुंबाचे दोन कार्ड्स
मृत - मृत व्यक्तींच्या नावावर रेशन
स्थलांतरित - जिल्हाबाहेर गेलेले
निष्क्रिय - ६ महिने धान्य न घेतलेले