काय मूर्ख बाई आहे म्हणत राऊतांचा जोरदार हल्लाबोल

    दिनांक :25-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली
sanjay raut नीट पेपरफुटी प्रकरण आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात असून, या मुद्द्यावरून संसदेचे कामकाजही 27 जुलैपर्यंत ठप्प झाले आहे. ठाकरे गटानेही या प्रकरणावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले असून, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
 

sanjay raut 
संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरही निशाणा साधला. नीट पेपरफुटीचा फायदा घेतल्याच्या त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी सीतारामन यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. “निर्मला सीतारामन या मूर्ख बाई आहेत. त्यांना देशाविषयी काय माहीत आहे? त्यांच्या देशाविषयी भावना काय आहेत? त्यांना काय कळतं? आम्ही त्यांच्या नवऱ्याशी बोलू. ते शहाणे आहेत,” असे राऊत म्हणाले.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी एका वक्तव्यात, “मी पेपरफुटीचा फायदा घेतला, आणखी तयारी केली, त्यामुळे माझी कामगिरी सुधारली,” असे म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून संजय राऊत यांनी टीका केली.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. “पेपरफुटीतील मुख्य आरोपी हे धर्मेंद्र प्रधान आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत होते की, आम्ही या प्रकरणात कठोर कायदा आणू. मात्र, पेपरफुटीसंदर्भात आधीपासूनच कायदा आहे. त्यांची जुनी भाषणे पाहा. यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान आहेत,” असे राऊत यांनी म्हटले.धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक विद्यार्थी, तरुण आणि विरोधी पक्षांकडून केली जात असल्याचे सांगत राऊत म्हणाले की, “राहुल गांधी, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आंदोलन करत आहेत. सरकार त्यांना का वाचवत आहे? त्यांचा राजीनामा घ्यावा लागेल.”यावेळी संजय राऊत यांनी सत्ताधारी गटातील नेत्यांच्या सुरक्षेवरूनही टीका केली. “देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची सुरक्षा वाढवली आहे. काही मंत्र्यांनी स्वतःचे वेगळे बॉडीगार्ड ठेवले आहेत. ठाण्यातील उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पाहा. जितका ताफा पंतप्रधान आणि sanjay raut  गृहमंत्र्यांचा नाही, तितका ताफा त्यांचा आहे,” असे ते म्हणाले.महाराष्ट्रासह देशातील वातावरण सरकारविरोधी असल्याचा दावा करत राऊत म्हणाले की, “पदोपदी धोका आहे. त्यामुळे मंत्री, आमदार आणि खासदारांनी बाहेर फिरू नये. बाहेर वादळ घोंघावत आहे. वादळाशी खेळू नका. गद्दारांनी कोणताही धोका पत्करू नये. वातावरण चिघळले आहे. मी मानवतेच्या भावनेने सांगत आहे. काही अघटीत घडू नये, यासाठी त्यांनी निर्णय घेतला आहे.”
केंद्र सरकारने गरज पडल्यास लष्कराची मदत मागावी, असेही राऊत यांनी म्हटले. “शिवाजी पार्क, पुणे आणि नाशिकमध्ये तुम्ही पाहिले असेल. त्यामुळे दिल्लीत फिरू नका. दिल्लीत गेल्यावर गडबड होईल. जनतेशी गद्दारी केली, त्यांना धोका आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
याशिवाय, माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी सरकारवर टीका केली. “जगदीप धनखड यांनी काही वेळा शेतकऱ्यांची बाजू घेतली होती. सरकारच्या निर्णयांवर टीका केली होती. ते विरोधकांना भेटत होते आणि त्यांच्याशी चर्चा करत होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. आता सरकारविरोधात तरुण आंदोलन करत आहेत,” असे राऊत यांनी म्हटले.