ग्लासगोमध्ये भारताची पदकांची चौकार!

    दिनांक :27-Jul-2026
Total Views |
ग्लासगो,
India's haul of four medals in Glasgow २०२६च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टरनी दमदार कामगिरी करत देशाच्या पदकांची संख्या चारवर नेली आहे. ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानूच्या सुवर्णपदकानंतर ऋषिकांत सिंग आणि राजा मुथुपांडी यांनी आपल्या-आपल्या वजनी गटात रौप्यपदके पटकावत भारताच्या पदकतालिकेत भर घातली. यापूर्वी पॅरा-पॉवरलिफ्टर झंडू कुमारने कांस्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात मीराबाई चानूने १९० किलो वजन उचलत भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. तिने स्नॅचमध्ये ८५ किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये १०५ किलो वजन उचलले. या कामगिरीदरम्यान तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अनेक विक्रमही मोडले. यानंतर पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात मणिपूरच्या २८ वर्षीय ऋषिकांत सिंगने दुखापत असतानाही रौप्यपदकावर नाव कोरले. स्नॅचमध्ये १२१ किलो वजन उचलत त्याने राष्ट्रकुल क्रीडा विक्रमाची बरोबरी केली आणि क्लीन अँड जर्कच्या आधी तो सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर होता. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला पुढील फेरीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याने १४३ किलो वजन उचलले, तर पुढील दोन प्रयत्न अपयशी ठरले.
 

fdt567678 
 
 
अखेर २६४ किलोच्या एकूण वजनासह त्याला रौप्यपदक मिळाले. मलेशियाच्या मोहम्मद अनीक कासदानने २७३ किलो वजन उचलत सुवर्णपदक जिंकले. त्याने क्लीन अँड जर्कमध्ये १५२ किलो वजन उचलून नवा राष्ट्रकुल विक्रम प्रस्थापित केला. केनियाच्या जोशुआ अमुंगा म्बोयाने २६० किलो वजनासह कांस्यपदक पटकावले.रात्रीच्या सत्रात ६५ किलो वजनी गटात राजा मुथुपांडीने भारतासाठी आणखी एक रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदार्पणातच त्याने स्नॅचमध्ये १२६ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो वजन उचलत एकूण २८६ किलो वजनाची नोंद केली. मलेशियाच्या मोहम्मद अझनील बिन बिदिनने २९९ किलो वजनासह सुवर्णपदक पटकावले, तर पापुआ न्यू गिनीच्या मोरिया बारूने २८२ किलो वजन उचलत कांस्यपदक जिंकले.
 
यापूर्वी पुरुषांच्या हेवीवेट गटात पॅरा-पॉवरलिफ्टर झंडू कुमारने कांस्यपदक जिंकून भारताचे पदक खाते उघडले होते. मणिपूरच्या ३१ वर्षीय अनुभवी खेळाडूने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमधील पहिल्या प्रयत्नांत अपयश आले तरी शानदार पुनरागमन केले आणि कांस्यपदकावर नाव कोरले. या कामगिरीनंतर २०२६च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत आठव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया १४ सुवर्ण, आठ रौप्य आणि ११ कांस्य अशा एकूण ३३ पदकांसह अव्वल स्थानावर आहे. भारतीय वेटलिफ्टरच्या दमदार कामगिरीमुळे भारताच्या पदकांची संख्या चारवर पोहोचली असून, स्पर्धेतील पुढील सामन्यांकडूनही देशाला मोठ्या अपेक्षा आहेत.