मुंबई,
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत, महाराष्ट्रात मतदारांशी संबंधित माहिती संकलनाचे ८७.७९ टक्के अर्ज वितरित करण्यात आले असून, त्यापैकी ६०.४४ टक्के अर्जांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या माहितीपत्रकानुसार, या एसआयआर प्रक्रियेतील माहिती संकलनाचा टप्पा ३० जून ते ८ ऑगस्ट या कालावधीत राबविला जात आहे. एकूण ९,७८,५४,०४९ मतदारांच्या तुलनेत ८,५९,०५,०९५ इतके माहिती संकलन अर्ज वितरित करण्यात आले आहेत, तर ५,९१,४२,६२४ अर्ज डिजिटल स्वरूपात रूपांतरित करण्यात आले आहेत. ही प्रक्रिया एकलाखांहून अधिक ‘बूथ लेव्हल अधिकारी’यांच्यामार्फत राबवली जात असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरीमध्ये सर्वाधिक ८६.०३ टक्के डिजिटलायझेशन नोंदवले गेले, त्याखालोखाल यवतमाळ (८५.२० टक्के), बुलढाणा (८२.६६ टक्के), हिंगोली (८२.६३ टक्के), परभणी (८१.९४ टक्के), गडचिरोली (८०.८४ टक्के) आणि चंद्रपूर (०८२ टक्के). प्रमुख शहरी जिल्ह्यांपैकी, ठाणे जिल्ह्यात वितरण ६७.९७ टक्के आणि डिजिटलायझेशन २७.५६ टक्के, मुंबई उपनगरमध्ये वितरण ६७.७९ टक्के आणि डिजिटलायझेशन २८.७२ टक्के, मुंबई शहरात वितरण ७२.३७ टक्के आणि डिजिटलायझेशन ३८.८८ टक्के, तर पुणे जिल्ह्यात वितरण ७० टक्के आणि डिजिटलायझेशन ४५.०४ टक्के इतके नोंदवले गेले. नाशिकमध्ये ८५.७८ टक्के वितरण आणि ५७.८८ टक्के डिजिटायझेशन नोंदवले गेले, तर पालघरमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ७९.७३ टक्के आणि ३९.९५ टक्के इतके होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.