मुंबई
heavy monsoon rains देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने वेग घेतला असून महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या चार राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, आज मान्सून संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील १३ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह (विशेषतः कोकण आणि विदर्भ), ओरिसा, पश्चिम बंगाल, केरळ, बिहार, झारखंड आणि उत्तराखंड या राज्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून, काही भागांत अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे
गुजरातमधील जूनागढ येथे मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये तब्बल चार फूट पाणी साचले असून रस्त्यांवरून बोटी चालवण्याची वेळ आली आहे. नवसारी येथे अंबिका नदीवरील पुलाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडल्याने ११ गावांचा संपर्क तुटला आहे.
महाराष्ट्रातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसईतील नालासोपारा परिसरात रस्ते अक्षरशः नदीत रूपांतरित झाले असून सुमारे २० कार पाण्यात बुडाल्या आहेत. मुंबईमध्ये ६४ झाडे कोसळली, तर आठ घरांच्या भिंती ढासळल्या. पालघरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. प्रशासनाने आतापर्यंत १८० हून अधिक नागरिकांची सुटका केली आहे.दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह देशातील १३ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देशभरातून समोर आलेल्या पावसाच्या heavy monsoon rains चित्रांमध्ये गुजरातमधील जूनागढ येथे कंबरभर पाण्यातून बोटीत बसून सुरक्षितस्थळी जात असलेली मुले दिसत आहेत. मध्य प्रदेशातील हरदा येथे कालीमाचक नदीचे पाणी पुलावरून सुमारे तीन फूट उंचीने वाहत आहे, तर उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मुसळधार पावसानंतर रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे.उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे पावसादरम्यान हवामान अचानक बिघडल्याने एका खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. लँडिंगच्या सुमारे दोन मिनिटे आधी हवामान खराब झाल्यानंतर वैमानिकाने हेलिकॉप्टर शाळेच्या आवारात उतरवले. त्यावेळी तेथे १० ते १२ मुले खेळत होती. हेलिकॉप्टरमध्ये दोन प्रवासी आणि एक वैमानिक होता.
महाराष्ट्रातील रायगडमध्येही मुसळधार heavy monsoon rains पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. गुजरातमधील पोरबंदर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबईमध्ये खराब हवामानादरम्यान अभिनेता आमिर खान यांच्या घराजवळ वादळामुळे एक झाड कोसळले. विशेष म्हणजे आज त्यांचा विवाह होणार असल्याची माहिती आहे आणि हा त्यांचा तिसरा विवाह असल्याचे सांगितले जात आहे.ठाणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे पाईपलाईन फुटल्याने रस्त्याखालून पाणी वेगाने बाहेर येऊ लागले. वसईतील मधुबन परिसरात रस्त्यांवर सुमारे पाच फूट पाणी साचल्याने जवळपास २० कार बुडाल्या. एका व्यक्तीने दावा केला की, पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात एक कार सुमारे ५० मीटरपर्यंत वाहून गेली.छत्तीसगडमध्येही पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. मुंबईतील कुर्ला टर्मिनसजवळील रस्ते जलमय झाले. राजस्थानमधील जैसलमेर येथे मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एका हॉटेलच्या छतावरील सोलर पॅनेल उडून रस्त्यावर पडले. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले. जैसलमेरमध्ये रविवारी सकाळीही वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद झाली.मुंबईतील घाटकोपरच्या विक्रांत सर्कल परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसादरम्यान एक मोठे झाड कोसळून अनेक कार त्याखाली दबल्या. छत्तीसगडमध्ये रविवारी रात्री रायपूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. रायपूरमध्ये अवघ्या अर्ध्या तासात ३० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचले असून टाटीबंध परिसरातील घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले आहे.