-आधी पाऊस आता उकाडा -हवामान बदल, जल प्रदूषणाचा फटका
नागपूर,
Pollution and Climate Change काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा लपंडाव,अधूनमधून उकाडा, यामुळे वातावरणात झालेल्या बदल व जल प्रदूषणाचा अनेेकांना फटका बसला असून घरोघरी व्हायरल, ताप, सर्दी तसेच जलजन्य आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. वस्त्या-वस्त्यांमधील दवाखान्यातील गर्दी हेच दर्शवते. पूर्वी कधीतरी होणारे सर्दी-ताप, खोकला आताशा वर्षांतून वारंवार सतावत असल्याचा अनुभव प्रत्येकालाच आता नवा नसून त्याला ‘व्हायरल’ म्हणजे हंगामी म्हटले जाऊ लागले आहे. त्याचे मूळ कारण कमकुवत प्रतिकारशक्ती असले तरी प्रदूषणाबरोबच हवामान बदल हे कारण असल्याचे तज्ज्ञ सांगतात. घरात एकजण तरी सर्दी-ताप व्हायरल आजाराने त्रस्त दिसतो आहे.
प्रदूषण व सतत हवामान बदल, त्याचा प्रतिकारशक्तीवर परिणाम विविध कारणांमुळे होत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. या महिन्यात प्रारंभी पाऊस पडला. काल बुधवारी दुपारी आला. सायंकाळनंतर पावसाने उसंत घेतली. गुरुवारी दुपारी उकाडा जाणवत होता. पाणी ओसरले तरी वातावरणातील बदल व फटका नागरिकांना बसू लागला आहे. दिवसा किंवा रात्री मध्येच उकाडा (उम्मस) मग पुन्हा पाऊस व थंडी. सर्दी-ताप व्हायरल, मळमळ, उलटी, पोटदुखी, हगवण, डायरिया आदींच्या तक्रारी उद्भवू लागल्या आहेत. शहरातील कुठल्याही भागात जा, वस्त्या-वस्त्यांमधील दवाखान्यांत नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे.
जलजन्य आजाराचे रुग्णही असले तरी पाऊस, घरांमध्ये शिरलेले पाणी यामुळे पोटदुखी, डायरिया हा आजार घरोघरी आहे. गॅस्ट्रो, विषमज्वर, कावीळ वा इतर आजाराचे लगेचच निदान होत नसले तरी, आणखी काही दिवसांनी हे जलजन्य आजार आपले रूप दाखवू शकतात.