रायगड
mns raj-thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आगामी रायगड दौèयाच्या काही दिवस आधीच पक्षात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. रायगड जिल्ह्यातील मनसेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. ९ ऑगस्ट रोजी राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्याची तयारी सुरू असतानाच हे राजीनामा सत्र समोर आल्याने पक्षश्रेष्ठींना मोठा शॉक बसला आहे. जिल्हा स्तरावरील या मोठ्या घडामोडीमुळे रायगडमध्ये मनसेची संघटनात्मक बांधणी धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अंतर्गत फेरबदल आणि कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी
mns raj-thackeray पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या सर्व पदांचा त्याग करणाऱ्यांमध्ये माजी रायगड संपर्क प्रमुख दिलीप सांगळे, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रतीक रहाटे, रोहा तालुका अध्यक्ष बाबू फुलारे आणि माथाडी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजा टेंबे यांसारख्या अत्यंत प्रभावी नेत्यांचा समावेश आहे. या सर्वांनी अधिकृत पत्राद्वारे आपला राजीनामा थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. मनसेमध्ये अलीकडच्या काळात झालेले अंतर्गत बदल आणि वरिष्ठांच्या काम करण्याच्या पद्धतीवर स्थानिक कार्यकर्ते आणि हे प्रमुख पदाधिकारी प्रचंड नाराज होते. या अंतर्गत असंतोषामुळेच त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष
mns raj-thackeray ऐन दौèयाच्या तोंडावर रायगडमध्ये सुरू झालेल्या या राजीनामा सत्रामुळे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मनसेतून बाहेर पडलेले हे दिग्गज नेते आता कुठली नवी वाट धरणार, याविषयी विविध आकडेमोड सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे नाराज पदाधिकारी सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) किंवा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. राज ठाकरेंच्या आगमनापूर्वीच रायगड मनसेत पडलेले हे भगदाड भरून काढण्याचे मोठे आव्हान आता पक्षातील उर्वरित नेतृत्वापुढे उभे ठाकले आहे.