चित्तौडगड
amit shah केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चित्तौडगड येथे विविध विकासकामांचे शिलान्यास आणि लोकार्पण केले. यामध्ये निंबाहेडा येथील २१ फूट उंच अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे लोकार्पण तसेच तब्बल ५,९५९ कोटी रुपयांच्या विकासकामांचा समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान शाह यांनी ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत, पक्षाने देशाची आणि जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली.
अमित शाह म्हणाले की, १५ ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन पाहिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा झाला. मात्र, यंदाच्या सोहळ्यात एक मोठा बदल पाहायला मिळाला आणि माझ्यासारख्या कोट्यवधी लोकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा बदल होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ८० वर्षांनी लाल किल्ल्याच्या प्राचीरावर ‘वंदे मातरम्’चे गायन झाले.
काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ला विसरून टाकल्याचा आरोप शाह यांनी केला. “भारत मातेची मी वंदना करतो,” असे म्हणत हजारो-लाखो स्वातंत्र्यसैनिक फाशीच्या फंद्यावर चढले, गोळ्या झेलल्या, लाठ्या खाल्ल्या आणि अनेक वर्षे तुरुंगवास भोगला, असे त्यांनी सांगितले. मतपेढीच्या राजकारणामुळे काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ला विसरले असून, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रगीताचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसने जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून amit shah पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ला सन्मान दिला, मात्र काँग्रेसने राष्ट्रीय गीताचा अपमान केल्याचा आरोपही शाह यांनी केला. काँग्रेसच्या मुख्यालयात ‘वंदे मातरम्’चे गायन सुरू असताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना गायन थांबविण्यास सांगितल्याचा दावा त्यांनी केला. “आपण सर्वांनी हे टीव्हीवर पाहिले,” असे शाह म्हणाले.“८० वर्षांनंतर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा हा अमर मंत्र आणि अमर गान पुन्हा सन्मान मिळवत असताना काँग्रेसला ते आवडत नाही,” अशी टीका शाह यांनी केली. सोनिया गांधी यांना उद्देशून ते म्हणाले की, “सोनियाजी, १४० कोटी जनता आपल्याकडे पाहत आहे. आपण केलेले हे पाप देशाची जनता कधीही माफ करणार नाही. ‘वंदे मातरम्’चे गायन अर्धवट सोडले जावे, असा विचारही कोणी स्वप्नात करू शकत नाही.”
काँग्रेसच्या नेत्यांनी दोन्ही हात जोडून बंकिम amit shah बाबूंच्या अमर आत्म्याची आणि देशाच्या जनतेची माफी मागावी, असे आवाहनही शाह यांनी केले.दरम्यान, भाजपनेही काँग्रेसवर निशाणा साधत पक्षाचे सर्वोच्च नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या मुख्यालयात ‘वंदे मातरम्’च्या गायनावेळी घोर अनादर केल्याचा आरोप केला आहे. भाजपने या प्रकरणी संबंधित नेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. भाजपच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांनी कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण गायन करण्यास आक्षेप घेतल्याचा आरोपही केला.मात्र, विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने भाजपचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘वंदे मातरम्’च्या पूर्ण आवृत्तीचे गायन थांबविण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आला नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.