तन्वी शर्मा तैपेई ओपन 'सुपर ३००' विजेती

स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात तरुण विजेती ठरली

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |

 

तैपेई
tanvi-sharma भारताची १७ वर्षीय तन्वी शर्मा हिने आपले पहिले 'बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ३००' बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि तैपेई ओपन जिंकणारी कोणत्याही श्रेणीतील सर्वात तरुण खेळाडू म्हणून इतिहासात आपले नाव कोरले. रविवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तन्वीने व्हिएतनामच्या सहाव्या मानांकित खेळाडू न्गुयेन थुई लिन्हचा २१-१६, २१-१६ असा दणदणीत पराभव केला.

tanvi sharma 
 
  

tanvi-sharma या ऐतिहासिक विजयामुळे तन्वी तैपेई ओपन जिंकणारी केवळ दुसरी भारतीय महिला एकेरीतील खेळाडू ठरली आहे; यापूर्वी सायना नेहवालने (२००८) ही कामगिरी केली होती. या विजयाने या स्पर्धेतील भारताचा १७ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपविला आहे. २००९ मध्ये 'ग्रँड प्रिक्स गोल्ड' काळात ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू यांच्या मिश्र दुहेरी जोडीने मिळवलेल्या विजयानंतरचा हा भारताचा एकूण तिसरा विजय ठरला आहे.

tanvi-sharma पहिल्या गेममध्ये तन्वीने सुरुवातीलाच आपले वर्चस्व सिद्ध करत १०-२ अशी आघाडी घेतली. न्गुयेनने गुणसंख्या १०-८ अशी करून अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला असला, तरी भारतीय खेळाडू कधीही पिछाडीवर पडली नाही व तिने सहजपणे पहिला गेम २१-१६ असा जिंकला.
 

tanvi-sharma दुसऱ्या गेमच्या सुरुवातीला तन्वी ०-३ अशी पिछाडीवर होती, परंतु तिने लवकरच सावरत आघाडी घेतली आणि अखेरीस आपली आघाडी सात गुणांपर्यंत वाढविली. आक्रमक रणनीतीचा अवलंब करत तिने प्रतिस्पर्ध्याला डोके वर काढण्याची संधी दिली नाही; तसेच उत्कृष्ट 'क्रॉस-कोर्ट' शॉट्स आणि अचूक 'प्लेसमेंट'चा प्रभावी वापर केला. तिने आपला वेग आणि लय कायम राखत गेम २१-१६ असा जिंकला. अंतिम गुण एका शानदार 'क्रॉस-कोर्ट ड्रॉप शॉट'द्वारे मिळवित तिने अवघ्या ३६ मिनिटांत हा अंतिम सामना आपल्या नावे केला.

 
tanvi-sharma हे विजेतेपद जिंकल्याचा मला खूप आनंद होत आहे. प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक सामन्यात मी केवळ माझे सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण स्पर्धेत मी खूप चांगली खेळले असे मला वाटते, असे तन्वी आपल्या या शानदार कामगिरीबद्दल बोलताना म्हणाली. मी थोडी अस्वस्थ होते, पण मी स्वतःला सांगितले की १०० टक्के योगदान द्यायचे आणि माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे, असेही तिने सांगितले.
 

tanvi-sharmaया विजयासह, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू आणि देविका सिहाग यांच्यासह एका प्रतिष्ठित गटात सहभागी होत, 'सुपर ३००' किंवा त्याहून उच्च दर्जाचे विजेतेपद मिळवणारी ती केवळ चौथी भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. तसेच, 'बीडब्ल्यूएफ सुपर ३००' स्पर्धा जिंकणारी ती जगातील तिसरी सर्वात तरुण खेळाडूही झाली आहे.