यवतमाळमध्ये पाच हजारांवर प्रौढ झाले साक्षर

५ हजार २२५ पैकी १२ अनुत्तीर्ण

    दिनांक :31-Aug-2026
Total Views |

 

यवतमाळ
adults-become-literate वय झाले की डोळ्यांना दिसणे कमी होते, चालणे कठीण होऊन जाते. मग शिकणार कसे, असा प्रश्न पडतो. मात्र, मनात जिद्द असेल तर वयाची मर्यादा शिक्षणाच्या आड येत नाही. हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील तब्बल ५ हजार २१३ प्रौढांनी नवसाक्षरतेची परीक्षा उत्तीर्ण केली असून, त्यांना आता प्रमाणपत्र मिळणार आहे.
 
audult

केंद्र सरकारच्या १०० टक्के साक्षर भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील निरक्षर प्रौढांची नोंदणी करून त्यांना शिक्षणाचे धडे देण्यात आले. मार्च महिन्यात या प्रौढांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत वाचन, लेखन व संख्याज्ञान या तीन घटकांवर आधारित एकूण १५० गुणांची परीक्षा घेण्यात आली.

जिल्ह्यातील ९९१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेला ५ हजार २२५ प्रौढ बसले होते. त्यापैकी ५ हजार २१३ प्रौढ उत्तीर्ण झाले, तर केवळ १२ जण अनुत्तीर्ण झाले. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात शिक्षणाची नवी सुरुवात करणाऱ्या या ज्येष्ठांच्या जिद्दीचे कौतुक होत आहे.


तालुकानिहाय नवसाक्षर

आर्णी - २०७

बाभूळगाव - १४५

दारव्हा - ८७५

दिग्रस - ११०

घाटंजी - २८८

कळंब - १६६

महागाव - २९९

मारेगाव - ३०५

नेर - ७६५

पांढरकवडा - २७०

पुसद - ५८३

राळेगाव - १२८

उमरखेड - ४१

वणी - ४३३

यवतमाळ - ५८०

झरी - ३८