आधी लक्ष्यपूर्ती मगच शस्त्रसंधी!

ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा दावा

    दिनांक :05-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Major claim regarding Operation Sindoor 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारतीय सैन्याच्या अचूक आणि वेगवान कारवाईमुळे पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण झाला होता. या कारवाईनंतर पाकिस्तानने १० मे २०२५ रोजी सकाळी डीजीएमओ हॉटलाइनद्वारे भारताकडे तातडीने शस्त्रसंधीची विनंती केली होती, असा दावा नुकतेच निवृत्त झालेले माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान यांनी एका कार्यक्रमात केला.अनिल चौहान यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची विनंती आल्यानंतर भारताने तातडीने प्रतिसाद न देता दुपारपर्यंत प्रतीक्षा केली. कारण त्यावेळी भारतीय सैन्याची काही महत्त्वाची लक्ष्ये गाठायची बाकी होती. नियोजित कारवाई पूर्ण झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात आला.
 
 
Major claim regarding Operation Sindoor
 
चौहान यांनी सांगितले की, ९ मेच्या रात्रीपासून १० मेच्या दुपारपर्यंत भारतीय सैन्याने पाकिस्तानातील एकूण ११ लष्करी तळांवर लक्ष्यित हल्ले केले. या कारवाईत अनेक हवाई तळ, हँगर, रडार केंद्रे आणि लढाऊ विमानांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. रावळपिंडी, नूर खान, रहीम यार खान आणि भोलारी येथील तळांवर मोठे नुकसान झाले असून तेथील दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.त्यांनी असेही सांगितले की, ९ मे रोजी पाकिस्तानकडून भारताला पुढील ४८ तासांत प्रत्युत्तर देण्याचे इशारे दिले जात होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने चर्चेसाठी पुढाकार घेतल्याने परिस्थितीतील बदल स्पष्ट झाला.
 
 
 
अनिल चौहान यांच्या मते, भारताने सकाळी साडेनऊ वाजता शस्त्रसंधी स्वीकारली नाही, कारण निर्णायक लष्करी उद्दिष्टे पूर्ण करणे आवश्यक होते. पाकिस्तानला संघर्ष सुरू राहिल्यास आणखी मोठे नुकसान सहन करावे लागेल, याची जाणीव झाल्यानंतरच त्यांनी युद्धबंदीची विनंती केली.पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे २०२६ रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले होते. या हल्ल्यात २५ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैबा या संघटनांशी संबंधित नऊ दहशतवादी तळांवर लक्ष्यित हल्ले केले.यानंतर पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील सीमावर्ती लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले निष्फळ ठरवले. त्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई करत आपले अभियान पुढे सुरू ठेवले.