जडेजा, सुथार, कुलदीपने टिपले प्रत्येकी दोन बळी

श्रीलंका एकादश ८ बाद ३६३

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |

 

कोलंबो
warm-up match  येथील 'नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब'च्या मैदानावर सुरू असलेल्या तीन दिवसीय सराव क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या 'एसएलसी एकादश'ने ९० षटकांत ८ बाद ३६३ धावा केल्या. भारताच्या फिरकी गोलंदाजांच्या फळीतील रवींद्र जडेजा, मानव सुथार व कुलदीप यादवने प्रत्येकी दोन बळी मिळविले. नियमित कर्णधार शुभमन गिल याला उजव्या हाताच्या अनामिकेला दुखापत झाल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत के.एल. राहुलने संघाचे नेतृत्व केले.

kuldeep yadav 
 
warm-up match दिवसाच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना फारशी मदत न करणाऱ्या सपाट खेळपट्टीवरही जडेजा (२-६४), सुथार (२-४८) व कुलदीप (२-७६) या त्रिकुटाने चेंडूला चांगले वळण दिले. उंचपुरा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने एक बळी मिळविला, तर मोहम्मद सिराज व प्रसिध कृष्णाला मात्र एकही बळी मिळाला नाही.नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर यजमान संघाला दमदार सुरुवात मिळाली. सलामीवीर निशान मदुष्का आणि रविंदू रसांथाने पहिल्या गड्यासाठी शतकी भागीदारी करीत सकाळच्या सत्रावर वर्चस्व गाजविले. आक्रमक पवित्रा घेत खेळणाऱ्या मदुष्काने उत्कृष्ट लयीत फलंदाजी केली व भारतीय वेगवान गोलंदाजांची मैदानावर सर्वत्र धुलाई केली; मात्र दुर्दैवी गैरसमजामुळे तो ६६ धावांवर धावबाद झाला.

 

warm-up match नाममात्र हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर सिराज व कृष्णाने सुरुवातीच्या काळात अचूक शिस्त राखता आली नाही. आयपीएल २०२६ नंतर पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या जडेजाने दुपारच्या जेवणानंतर दुसऱ्या भागीदारीसाठीची भागीदारी तोडली; त्याने पासिंदू सुरीयाबंदाराला एका वेगाने सरळ स्टम्पवर आदळणाऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर सुथारने चेंडू हवेत फिरवण्याची व वळवण्याची कला दाखवली. त्याने रसांथाला पुढे येऊन फटका मारण्याच्या घाईत चूक करण्यास भाग पाडले आणि आणखी एक धोकादायक भागीदारी संपुष्टात आणली. ब्रारने वेगवान आणि उसळी घेणाऱ्या चेंडूंचा प्रभावी मारा केला आणि चहापानाच्या विश्रांतीपूर्वी पवन रत्नानायकेला बाद केले.
 

warm-up matchअखेरच्या सत्रात खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करू लागल्याने भारताने सामन्यावर अधिक पकड मिळविली. कुलदीपने अहान विक्रमसिंघेला बाद केले; अहानने 'स्वीप' फटका मारण्याचा प्रयत्न केला असता चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागून 'डीप'मध्ये उभा असलेल्या ब्रारच्या हातात गेला. त्यानंतर कुलदीपने अंजला बांदाराला पायचीत करीत श्रीलंकेच्या मधल्या फळीची कंबर मोडली.

कर्णधार सोनल दिनुशाने आक्रमक पवित्रा घेत सुरेख अर्धशतक झळकावले आणि यजमान संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र, त्यानंतर जडेजाच्या सरळ चेंडूवर रमेश मेंडिस पायचीत झाला, तर सुथारने दिनुशाची ५२ धावांची खेळी संपुष्टात आणली.

उशिरा संघात आलेला ऑफ-स्पिनर सारांश जैनने बराच वेळ गोलंदाजी केली पण त्याला यश मिळाले नाही. १५ ऑगस्टपासून गॅले येथे श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय गोलंदाजांना भरपूर सराव मिळाला, तरीही सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी ३६० हून अधिक धावा दिल्या गेल्याची त्यांना नक्कीच चिंता वाटत असेल.