ऑगस्टनंतर सप्टेंबरही कोरडा? राज्यावर दुष्काळाचे सावट

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
मुंबई
maharashtra weather update जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नसला, तरी जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसाने त्याची काहीशी भरपाई केली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता आणखी एक चिंताजनक अपडेट समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यातही राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पिकांसमोरील संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
 

maharashtra weather update imd predicts below-normal rainfall in september, farmers face drought concerns 
जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने राज्याला काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे राज्यातील धरणांची सद्यस्थिती समाधानकारक आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतीच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांवर यंदा दुष्काळाचे सावट असल्याचे चित्र आहे. काही भागांत पावसाने जवळपास पूर्णपणे पाठ फिरवली असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यासाठी दिलेला कमी पावसाचा अंदाज शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारा ठरत आहे.
यंदाच्या पावसाळ्यावर सुरुवातीपासूनच एल निनोच्या संकटाची चर्चा होती. एल निनोचा भारतीय मॉन्सूनवर परिणाम होण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती. आता प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याचे सांगितले जात असून, त्याचा थेट परिणाम भारतातील मॉन्सूनवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सप्टेंबरमधील कमी पावसाच्या अंदाजामुळे एल निनोचा परिणाम प्रत्यक्षात जाणवणार का, अशी शंका उपस्थित होत आहे.
दरम्यान, १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाल्याची नोंद आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळाचे थेट संकेतही दिसून येत आहेत.
बीड, परभणी, छत्रपती maharashtra weather update संभाजीनगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास खरीप पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तरी पावसाची कृपा होईल आणि पिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
राज्याबरोबरच देशातील इतर काही भागांतही पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशांत महासागरातील एल निनोची स्थिती आणि त्याचा भारतीय मॉन्सूनवर होणारा संभाव्य परिणाम यामुळे यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील पावसाची स्थिती राज्यातील शेती आणि जलसाठ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.