परतीच्या पावसाचा जोर वाढणार 13 राज्यांना हाय अलर्ट

ताशी 80 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा

    दिनांक :20-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली/मुंबई 
heavy rain यंदा एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिले आहे. पावसातील तुटीचा थेट परिणाम शेतीवर झाला असून, अनेक भागांतील शेतकरी संकटात सापडले आहेत. काही राज्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत परतीचा मान्सून देशातील अनेक भागांत जोर पकडण्याची शक्यता असल्याने काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र, या पावसासोबतच मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा धोका असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
 

imd rain alert heavy rain and strong winds forecast in 13 states, maharashtra also on alert 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 ते 48 तासांत देशातील काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर 13 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसासोबतच काही ठिकाणी ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पर्वतीय भागांसाठी विशेष खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराळ प्रदेशात दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे अशा भागांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, जोरदार वाऱ्यांची शक्यता लक्षात घेता मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनीही पावसाचा आणि वाऱ्याचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असे हवामान विभागाने म्हटले आहे. जोरदार पावसामुळे काही राज्यांमध्ये उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
या हवामान बदलामागे बंगालच्या उपसागरातून निर्माण होणाऱ्या जोरदार वाऱ्यांची स्थिती महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत देशातील विविध भागांतील पावसाच्या परिस्थितीत वेगाने बदल होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही या कालावधीत heavy rain वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांतही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एकीकडे पावसाच्या तुटीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी परतीच्या पावसाचा जोर काहीसा दिलासा देणारा ठरू शकतो. मात्र, पावसासोबतच वेगवान वारे आणि अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिक, मच्छिमार आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.