महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ चे यजमानपद भारताला

    दिनांक :03-Sep-2026
Total Views |
मुंबई, 
Icc women champions trophy 2027 आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. प्रथमच आयोजित होणाऱ्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ चे यजमानपद आयसीसीने भारताला दिले आहे. यासोबतच स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाणाचीही घोषणा करण्यात आली आहे. ६ संघांची ही प्रतिष्ठित स्पर्धा पुढील वर्षी १४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान भारतात खेळवली जाईल. आयसीसीनुसार, स्पर्धेतील सर्व सामने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि वडोदरा येथील वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. या स्पर्धेत भारतासह जगातील ६ मोठे संघ विजेतेपदासाठी लढतील.
 

ICC 
आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ मूळतः श्रीलंकेत आयोजित होणार होती, परंतु आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठरवलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू असल्याने ही स्पर्धा भारतात हलवण्यात आली. नवीन यजमानाच्या निवडीसाठी आयसीसीने बांगलादेश, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा विचार केला. त्यानंतर या स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताची निवड झाली आणि १ सप्टेंबर रोजी आयसीसी बोर्डाने या निर्णयाला मंजुरी दिली.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी याला महिला क्रिकेटच्या एका रोमांचक नव्या पर्वाची सुरुवात म्हटले आहे. ते म्हणाले की, ही स्पर्धा जगातील सर्वोत्तम संघांना मोठ्या स्तरावर स्पर्धा करण्याची संधी देईल आणि इतर संघांना क्रमवारीत वर येण्यासाठी नवीन प्रेरणा देखील देईल. जय शाह म्हणाले की, आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ ही महिला क्रिकेटच्या एका रोमांचक नव्या पर्वाची सुरुवात आहे. स्पर्धेची पहिली आवृत्ती म्हणून, ती जगातील सर्वोत्तम संघांना एका थरारक आणि उच्च-स्तरीय स्पर्धेसाठी एकत्र आणेल. तसेच, संघांना क्रमवारीत वर चढण्यासाठी आणि जागतिक स्तरावर स्थान मिळवण्यासाठी अधिक प्रोत्साहन देईल.