- सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई मेट्रोला आदेश
नवी दिल्ली,
मुंबईच्या आरे जंगलातील वृक्षे तोडण्यास Supreme Court सर्वोच्च न्यायालयाने आज शुक‘वारी स्थगिती दिली. आमच्या पुढील आदेशापर्यंत या परिसरात एकही वृक्ष तोडला जाऊ नये, असे न्यायालयाने सांगितले. मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड होत असल्याच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज न्या. उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनापुढे सुनावणी पार पडली. कोणत्याही प्रकारची वृक्षतोड झाली नसल्याचा दावा मुंबई मेट्रोकडून करण्यात आला. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार आहे.
महान्यायाभिकर्ता तुषार मेहता यांनी मुंबई मेट्रोतर्फे बाजू मांडली. आरेमध्ये कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात आली नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये ‘जैसे थे’चे आदेश दिल्यानंतर एकही झाड तोडले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या काळात काही ठिकाणी झुडपे आणि तण वाढली होती, ती काढण्यात आली आहे. शिवाय, काही झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या आहेत. मात्र, कोणतीही वृक्षतोड झाली नाही, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ वकील चंदेर उदय सिंह यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. ‘जैसे थे’चा आदेश असतानाही आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी वृक्षतोड सुरू करण्यात आली आहे. कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड तयार करावा, असा समितीचा अहवाल असतानाही अधिकार्यांनी आरेमध्ये कारशेडसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या भागातील झाडे कापण्यात येत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी सविस्तर सुनावणी करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करताना न्यायालयाने योग्य न्यायासनासमोर 10 ऑगस्ट रोजी सुनावणी होईल, असे Supreme Court स्पष्ट केले.