गोंदिया,
मुस्लिम समाजाची दिशाभूल करुन दोन religious discord समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्याविरोधात कठोर कायदा करण्यात यावा, यासह विविध मागण्याचे निवेदन 19 जानेवारी रोजी स्थानिक विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने राष्ट्रपतींच्या नावे जिल्हा दंडाधिकार्यांना दिले. निवेदनानुसार, देश एका गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे.
जिहादी घटक देशात द्वेष आणि दहशतीचे religious discord वातावरण निर्माण करत आहेत. कधी ‘सर तन से जुदा गँग’ सक्रीय असते, तर कधी लव्ह जिहाद किंवा इतर जिहादच्या माध्यमातून हिंदू समाजात तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जाते. हिंदू संघटना, त्यांचे कार्यकर्ते आणि हिंदू नेत्यांवर हल्ले व हत्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. 8 जानेवारी रोजी आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील लोवीरपुरा येथे शंभू कॅरे या 16 वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची एका जिहादीने निर्घृणपणे हत्या केली. गेल्या 2 वर्षात केवळ बजरंग दलाच्या 9 कार्यकर्त्यांची हत्या झाली असून 32 कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. नुकतीच दिल्लीत घडलेली घटना देखील चिंता वाढवते. अनेक घटनांमध्ये त्यांनी खून करणार्या टोळीला सुपारीही दिली आहे, हे दिल्ली हत्याकांडावरून स्पष्ट होते. त्यामुळे समाजात मुस्लिम समाजाला भडकावणार्या मौलवी आणि नेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा, या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलांना प्रौढांप्रमाणेच वागणूक दिली जावी. जेणेकरुन या क्रूर हल्लेखोर व खुन्यांना संरक्षण मिळणार नाही. सिम्मी, पीएफआय, सिटीझन फोरम वगैरे फक्त नावं आहेत.
जिहादी विचारधारा हा प्रेरक religious discord घटक आहे, ज्याला आळा घालण्यासाठी केंद्राने कठोर कायदा करावा. द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात मदरशांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली जावी, अशी मागणी करुन सध्याचे केंद्र सरकार सजग आणि मजबूत असून हे सरकार या हिंसाचार आणि द्वेषाच्या वातावरणातून हिंदू समाजाला नक्कीच मुक्त करेल, असा विश्वासही निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. निवेदन देताना बजरंग दलाचे प्रांत सहसंयोजक नवीन जैन, विहिंप जिल्हा सहमंत्री सुनील कोहडे, विहिंप मठ मंदिर संपर्क प्रमुख विठ्ठल कोठेवार, विहिंप शहर मंत्री हरीश अग्रवाल, बजरंग दल जिल्हा संयोजक सुभाष पटले, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक अंकित कुलकर्णी, प्रदीप बिसेन, राजू लारोकार, संजय पटेल, बबलू गभणे, विजय रणदिवे, मोनू मडावी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.