नागपूर,
संस्कार हा समाज (Family system) व राष्ट्राचा आधार असावा. मी, माझे घर व कुटुंब एवढ्यापुरते मर्यादित न राहता, प्रत्येकाने सामाजिक स्थैर्यासाठी कुटुंबव्यवस्था महत्त्वपूर्ण मानून काम करावे व त्यादृष्टीने पुढील मार्गक्रमण करावे, असे आवाहन श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या संचालिका व ‘मनातलं बोलू काही’ उपक्रमाच्या प्रमुख मीरा कडबे यांनी केले. तरुण भारतच्या मनातलं बोलू काही या उपक्रमात शनिवारी सायंकाळी (Family system) 'विवाह : एक समृद्ध जीवनाचा मार्ग' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समुपदेशक गायत्री खरे, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रेणुका जांभोरकर व ज्योतिषविषयक मार्गदर्शक डॉ. प्रसाद निचत यांचा सहभाग होता.
याप्रसंगी मीरा कडबे यांनी, उत्तम माणूस घडविण्याचे केंद्र म्हणजे घर आणि (Family system) कुटुंब आहे, कुटुंबाचा विस्तार हा विवाहापासून होतो, त्यामुळे विवाहसंस्था सुलभरीत्या चालावी यासाठी विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक असल्याचे सांगितले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना गायत्री खरे यांनी, प्रेमविवाह आणि ठरवून केलेले लग्न या अवस्थांमध्ये न पडता, यात दोन व्यक्तींचा तसेच दोन कुटुंबांचा जीवनप्रवास महत्त्वपूर्ण मानून याकडे पाहण्याची गरज असल्याचे सांगितले.
लग्न जुळविताना दोन्ही बाजूंची माहिती जाणून घ्यावी, त्यासाठी आर्थिक सक्षमता आणि भावनिक सुरक्षितता या बाबींना महत्त्व द्यावे, प्रत्येकाची मने आणि मते जुळावी याचा विचार करावा, परस्पर आदराची भावना बाळगावी, असे आवाहन केले. यानंतरच्या सत्रात डॉ. रेणुका जांभोरकर यांनी, (Family system) विवाहापूर्वी दोन्ही बाजूंनी शारीरिक व आरोग्यविषयक गुणवैशिष्ट्यांवर भर द्यावा, आयुर्वेदाच्या समीकरणानुसार वात, पित्त आणि कफ या आधारे विवाहेच्छु युवक व युवती यांनी लक्ष द्यावे व जाणून घ्यावे त्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची गरज असल्याचे सांगितले.
या परिक्षणातून घरातील ताणतणाव निवळण्यास आणि (Family system) कौटुंबिक सौख्य लाभण्यास मदत होईल, असे सांगितले. ज्योतिषविषयक मार्गदर्शन करताना, आजवर जन्मपत्रिकेचा वापर केवळ वैवाहिक गुणमेलनासाठी होत होता, पण ग्रहस्थितीचा परिणाम जीवनावर होतो हे लक्षात घेता, समुपदेशनासाठी आलेल्या पक्षकाराला त्याची सद्यस्थिती व भविष्यात होणार्या घटनांची माहिती देण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशनात आता या बाबींचा विचार होणे आवश्यक असल्याचे मत प्रसाद निचत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन तरुण भारत डिजिटल विभागप्रमुख रेवती जोशी यांनी केले.