राष्ट्ररक्षा
Shivaji Maharaj शिवाजी महाराजांची रणनीती, गनिमी काव्यामुळे आजही देश सुरक्षित राहू शकतो शिवाजी स्फूर्ती केंद्र, श्रीशैलम, हैदराबाद, आंध्र प्रदेश, येथे शिवाजी महाराज राज्यकारभार, आधुनिक भारतासाठी धडे (Shivaji Maharaj State Craft, Lessons For Modern India) हा परिसंवाद 24-25 डिसेंबर 2022 ला आयोजित करण्यात आला होता. परिसंवादांमध्ये 25 वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञांनी भाग घेतला. या लेखामध्ये मी शिवाजी महाराजांची रणनीती, युद्धाचे डावपेच आणि गनिमी कावा या विषयावरचा माझा शोधनिबंध सादर करत आहे. शिवाजी महाराजांची नागरी सेवा प्रणाली आणि प्रशासन, महसूल संकलन आणि कर प्रणाली, त्यांच्या राजवटीत महिलांची सुरक्षा, स्त्रियांचा आदर आणि त्यांचे कल्याण, त्यांची लष्करी रणनीती, डावपेच, सशस्त्र दल, आयुध व्यवस्थापन आणि नौदल, या वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद झाला. त्यावेळचे शत्रू होते मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, देशाच्या आतले देशद्रोही आणि आजचे देशाचे शत्रू आहेत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश, दहशतवादी माओवादी आणि त्यांचे आतले देशद्रोही हस्तक.
मोगल /औरंगजेबाचे सैन्य
ते त्यावेळचे सर्वांत सामर्थ्यवान सैन्य होते. अनेक वर्षे राज्य केल्यामुळे हळूहळू ते आळशी, लालसी, अत्याचार करणारे बनू लागले. भाडोत्री सैनिकांची संख्या वाढली, वेगवेगळी विचारसरणी, एकमेकांशी संबंध फारसे चांगले नव्हते, रक्षण करण्याकरिता फार जास्त सैन्य वापरले जात होते. त्यामुळे आक्रमक कारवाईकरिता 50000-60000 सैन्य मिळायचे. मोगल सैन्य एक हालते शहर होते. कुटुंबाचे काबिले, बाजार बुणगे, बिन लढाऊ सैनिक, रसद पुरवणारे या सैन्याचा भाग होते. घोड्यांची रसद = 6 कि. ग्रॅम, सैनिकांची रसद = 2 कि. ग्रॅम. प्रति दिवस असायची. यामुळे बाजार बुणग्यांची संख्या सैनिकांच्या पाचपट जास्त होती. तोफखान्याकरिता, रस्ते, हत्ती, घोडे, उंट लागायचे. नद्या आणि नाले पार करणे कठीण असायचे. सैन्याचा चालण्याचा वेग 30 कि. मी. दिवसाला होता. आठवड्याला दोन विश्रांतीचे दिवस असायचे. लढाईचे दिवस आणि वेळ ज्योतिष शास्त्रावर अवलंबून असायचे. जिंकलेल्या भूमीवर आधिपत्य ठेवणे फार कठीण होते, Shivaji Maharaj ज्याला सैन्याची गरज पडायची. हुकूम/पत्रव्यवहार घोडेस्वारांच्या मदतीने व्हायचा. जखमी सैनिकांच्या उपचाराकरिा हकिमांची कमी असायची.
मोगलांचे युद्धाचे डावपेच
सैन्याच्या रचनेत पहिली फळी तोफखाना, दुसरी फळी एक डिव्हिजन, तिसरी फळी मुख्य सैन्य होती, घोडेस्वारांचा सैन्यावर बाजूने हल्ला (ATTACK FROM FLANKS) व्हायचा, मग हातघाईची मूठभेड होऊन सैन्याची पळापळ व्हायची. मोगल किल्ले लबाडी करून, धूर्तपणे जिंकले जायचे. तसे झाले नाही तर चारही बाजूने वेढा घालून, तोफांनी तटबंदीवर खिंडार पाडून हल्ला केला जायचा. पुरंदरचा किल्ला जिंकायला मोगलांना चार महिने लागले. मात्र तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला एका रात्रीत अचानक कड्याच्या बाजूने हल्ला करून जिंकला होता.
शिवाजी महाराजांचे सैन्य
Shivaji Maharaj शिवाजी महाराजांच्या सैन्याची सुरुवात 3000-4000 सैनिकांनी झाली. राज्याभिषेकाच्या वेळी 45 हजार बारगीर, 60 हजार शिलेदार, एकूण 105 हजार घोडदळ होते, पायदळ 60000 होते. पायदळ चपळ, काटक आणि अतिशय जलदगतीने हालचाल करणारे होते. महाराजांचे अंगरक्षक दोन हजार अतिकुशल, शूर मावळे होते. सैन्यात वेगावर मर्यादा येतील असे काही नव्हते. बाजारबुणग्यांना थारा नव्हता. ते लांब लांब मजल सहज मारीत असे. अचानक हालचाली करू शकत. युद्धाच्या वेळी नांगर सोडून प्रत्येक नागरिक शस्त्र हाती घ्यायचे, सर्व सैनिक, गुप्तहेर काम सुद्धा करायचे. तलवारी आणि भाले मुख्य शस्त्रे होती. तोफखान्यामुळे सैनिकांची हालचाल करण्याचा वेग हा कमी व्हायचा. तोफखान्याचा वापर फक्त किल्ल्यावर आणि नौदलाच्या बोटींवर केला जात होता. किल्ल्यांचे मुख्य काम आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे होते. शत्रूंच्या किल्ल्यांवर लक्ष ठेवण्याकरिता किल्ले, महत्त्वाच्या ठिकाणी किल्ले बांधले गेले होते. किल्ल्यांकरिता तटबंदी, मनोरे, वॉच टॉवर, खंदक, एक रस्ता, बाले किल्ला असायचा. Shivaji Maharaj शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचा वापर आक्रमक गनिमी काव्याकरिता केला.
शिवाजी महाराज आणि गनिमी कावा
मोगलांवर वेगवेगळ्या दिशेने हल्ले, अचानक हल्ले, कधी समोरून, कधी मागून, शत्रूंच्या कमजोर भागांवर हल्ले, शत्रू बेसावध असताना हल्ले, शत्रूच्या रसद पुरवणार्या रस्त्यांवर हल्ले, छोट्या टोळ्यांमध्ये हारकत, आजूबाजूला असलेल्या भागावरच आपला गुजारा, आजूबाजूंच्या नागरिकांची मदत गनिमी काव्याचा चांगला वापर केला जायचा. गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक/ जाधव होते. Shivaji Maharaj महाराजांचे गुप्तहेर खाते अति उच्च दर्जाचे होते. ज्यामुळे अनेक युद्धांमध्ये विजय मिळाला. शाहिस्तेखानावर हल्ला, सुरतवर हल्ला- नेमक्या गुप्तहेर माहितीमुळे शक्य झाला. महाराज स्वतः गुप्तहेर खात्यावर आपली नजर ठेवून असायचे. राज्याभिषेकाच्या वेळेला नौदलामध्ये 100 जहाजे होती. शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये अनेक किल्ले बांधले, त्यामुळे सुरक्षा कमालीची सुधारली. गलबतांवर 25 ते 30 नौसैनिक, गुराबावर 150 ते 300 नौसैनिक तैनात असायचे. या जहाजांनी गनिमी कावा वापरून, सागरी सुरक्षा सुधारली, समुद्रामध्ये सुद्धा स्वराज्य निर्माण केले .
एक दुर्ग महत्त्वाचा तो म्हणजे नरदुर्ग
अनेक थोर पुरुषांची प्रेरणा शि-वा-जी- या मंत्रात आहे. या मंत्राची प्रेरणा आज पण जरुरी आहे. आज देशासमोर सुरक्षेची अनेक आव्हाने आहेत. इतिहास हा गत काळाचा साक्षीदार, भावी काळाचा वाटाड्या असतो. जे राष्ट्र इतिहासापासून शिकत नाही ते कधीही महासत्ता बनू शकत नाही. राजांच्या असंख्य गुणांपैकी किती देशाच्या लोक प्रकृतीमध्ये उतरले हे महत्त्वाचे आहे. नरदुर्ग म्हणजे किल्ल्यासारखी बुलंद, मजबूत, शूर, निष्ठावान, पराक्रमी माणसे Shivaji Maharaj महाराजांनी बनवली. लढाईमध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक सैनिक आणि त्याचे शौर्य असते. लढाई सैनिकांमुळे जिंकली जाते, प्रत्येकच लढाईमध्ये सैनिक कसे लढतात यावर हरणे आणि जिंकण्याचा फैसला होतो. शिवाजी महाराजांनी धोकादायक परिस्थितीमध्ये सर्वात पुढे लढाई करून सैनिकांचे नेतृत्व केले आणि त्यामुळेच मराठ्यांनी त्यावेळेला महापराक्रम गाजवला. शिवाजी महाराजांची समोरून नेतृत्व करायची परंपरा आज सुद्धा भारतीय सैन्य चालवत आहे, ज्यामुळे चीन आणि पाकिस्तानला आपण धडा शिकवतो. परंतु त्याची किंमत आपल्याला आपल्या अधिकार्यांचे रक्त सांडून करावी लागते.
छत्रपती शिवरायांचे इतिहासात स्थान
कर्तृत्ववान आणि धोरणी राजा, रणनीतीचे नैपुण्य, दूरदृष्टी, शक्ती आणि युक्तीचा वापर, सर्वसामान्यांचा कैवारी, शिस्तप्रिय, कार्यकुशल शासनकर्ता, अतिकुशल युद्धनेतृत्व, जाणता राजा, ज्याने सर्वसामान्यांची हृदये जिंकली, असामान्य बुद्धिमत्ता आणि युद्धकौशल्याने तत्कालीन परिस्थितीला साजेशी युद्धयंत्रणा तयार केली, अत्याचाराने दबलेल्या हिंदूंच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली, छत्रपती शिवराय एक युगपुरुष होते.
Shivaji Maharaj शिवाजी महाराजांच्या आधी मराठा सरदार मोगलांकरिता सैनिकांचे काम करायचे किंवा त्यांच्याकरिता कर वसुली करायचे. परंतु शिवाजी महाराजांनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले की मराठा, स्वतःचे, जनतेचे आणि जमिनीचे मोगलांपासून रक्षण करून स्वतःचे स्वराज्य निर्माण करण्यास सक्षम होते. काही इतिहासकारांनी त्यांना फक्त महाराष्ट्राचे हिरो बनवून ठेवले आहे. शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशाचे हिरो आहेत.
हिंदुस्थानच्या इतिहासातून शिवराय, महाराष्ट्र आणि मराठे वगळल्यास केवळ पराजयच आणि पराजयच दिसतो. मराठा आणि मराठा धर्माने सतरावे आणि अठरावे शतक आपल्या पराक्रमाने गाजविले. Shivaji Maharaj शिवाजी महाराजांची युद्धपद्धती, राज्यपद्धती आधुनिक भारताला आज सुद्धा योग्य मार्गावर जाण्यामध्ये मदत करू शकते. शिवाजी स्फूर्ती केंद्राने आयोजित केलेल्या परिसंवादामुळे शिवाजी महाराजांना देशाच्या इतिहासामधले यांचे योग्य स्थान मिळण्यामध्ये नक्कीच मदत मिळेल. 100 टक्के शिवाजी होणे शक्य नसेल तर 40-50 टक्के, 20-30 टक्के तरी शिवाजी बना. तसे झाले तरच आपण जागतिक महाशक्ती बनू शकतो.
शिवाजी महाराज एक सामरिक तज्ज्ञ
एका वेळेस फक्त एकाच शत्रूशी लढाई, इतर शत्रूंशी समेट, कधी शत्रूंपासून रक्षण, कधी हल्ले, सामरिक खोलीकरिता आदिलशाहीवर हल्ले, मुघलांना सह्याद्री पर्वतरांगात यायला भाग पाडणे, अशी Shivaji Maharaj शिवाजी महाराजांची सामरिक युद्धनीती होती. वेगवेगळ्या ठिकाणचे सैन्य नेमके हल्ल्यांच्या वेळेला एका ठिकाणी आणायचे, किल्ल्यांचा वापर एक सुरक्षित स्थान म्हणून करायचा अशी त्यांची नीती होती. पोर्तुगीज, ब्रिटिश इतिहासकारांनी छत्रपतींची तुलना सिझर/ अलेक्झेंडर/ हनीबलशी या जागतिक दर्जाच्या महायोद्ध्यांशी केली. शिवाजी महाराज हे एक लष्करी प्रतिभावंत होते, ज्यांनी युद्ध लढण्याची भारतीय पद्धत विकसित केली आणि शत्रूंना भारतीय शस्त्रांनी पराभूत केले.\
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
9096701253