गोंदियावासीयांचा पुन्हा भ्रमनिराश !

04 Oct 2023 20:24:39
गोंदिया, 
Gondia guardian minister : जिल्हा स्थानिक पालकमंत्र्यांच्या बाबतीत नेहमीच दुर्दैवी ठरला आहे. गोंदियाला काही काळ का होईना स्थानिक पालकमंत्री मिळतील, अशी अशा जिल्हावासी बाळगून होते. मात्र त्यांचा भ्रमनिराश झाला. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रसेने जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम राखीत जिल्ह्याला धर्मरावबाबा आत्राम यांच्या रुपाने पाचवे पालकमंत्री देण्यात यश मिळविले.
 
Gondia guardian minister
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, 4 ऑक्टाबर रोजी 12 जिल्ह्यांची पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात गोंदिया जिल्हा पालकमंत्री म्हणून गडचिरोलीतील अहेरीचे राष्ट्रवादीचे आमदार तथा सध्या राज्यातील महायुती सरकारमध्ये अन्न व औषध प्रशासन मंत्री असलेले धर्मरावबाबा आत्राम यांची नियुक्ती केली. Gondia guardian minister राज्यात कुणाचेही शासन असो, गोंदिया जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून अन्य जिल्ह्यातील मंत्र्यांचीच वर्णी लागल्याचा इतिहास आहे. सन 1999 मध्ये जिल्हा निर्मितीपासून बाहेरील जिल्ह्याचा पालकमंत्री ही जणू जिल्ह्यासाठी भेटच ठरली आहे. जिल्ह्यातील पालकमंत्र्यांचा कार्यकाळ पाहता स्थानिक नेतेमंडळींना गाजरच मिळाला आहे. भंडारा-गोंदिया संयुक्त असताना सन 1995 च्या युती शासनात आमगावचे तत्कालीन आमदार तथा सिंचन मंत्री महादेवराव शिवणकर आणि 2014 च्या युती शासनात अर्जुनी मोरचे राजकुमार बडोले या दोन नेत्यांनाच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भुषविता आले. मागील 4 वर्षात गोंदियाला अनिल देशमुख, नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे, सुधीर मुनगंटीवार आणि आज धर्मराव बाबा आत्राम यांच्या रुपाने 4 वर्षात पाचवे गैरजिल्ह्यातील पालकमंत्री मिळाले. विशेषत: आघाडी शासनाच्या काळात कधीच स्थानिक नेत्यांना हा मान मिळाला नसताना कधीकाळी युती शासनकाळात स्थानिक पालकमंत्री लाभले होते. मात्र, आता युती शासन काळातही जिल्हावासियांचा भ्रमनिराश झाल्याचे बोलले जाते.
 
 
पटेलांनी भाकरी फिरवली
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गत जुलैमध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गट समाविष्ट सहभागी झाला. तेव्हापासून जिल्ह्याचा पालकमंत्री बदलणार अशी चर्चा होती. (Gondia guardian minister)( गोंदियात वजनदार नेता म्हणून असलेले राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल त्यांच्या पक्षातील पालकमंत्री गोंदियाला देणार ही चर्चा होती. त्याला आज राष्ट्रवादीचे आमदार तथा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्तीमुळे शिक्कामोर्तब झाला आहे. पटेलांनी सत्तेत सहभागी होताच आपला राजकीय वट दाखऊन भाकरी फिरवली अन् जिल्ह्याला आपल्या पक्षाचा पालकमंत्री दिला, अशी चर्चा आता जनमानसात आहे.
Powered By Sangraha 9.0