तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Animal Husbandry Department ग्रामीण भागातील पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार युवक, महिला, शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशूसंवर्धन विभागाच्यावतीने राबविण्यात येणार्या वैयक्तीक लाभच्या योजनांसाठी आभासी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनासाठी आभासी पद्धतीने लाभार्थी निवड प्रकि‘या या वर्षात राबविली जाणार आहे. Animal Husbandry Department डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी आभासी पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.
आभासी अर्ज भरण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे एएच-महाबीएमएस हे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे. अर्ज करण्याची मुदत 8 डिसेंबरपर्यंत आहे. मदतीसाठी टोल फ‘ी क‘मांक 18002330418 उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने वैयक्तीक लाभच्या योजनांतर्गत प्रकि‘या अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे आभासी पद्घतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. 2021-22 पासून जिल्हास्तर विविध योजनांसाठी ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी 2021-22 पासून पुढील पाच वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय शासनाने केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशूपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतीक्षा यादीतील क‘मांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज फक्त आभासी पद्धतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदवलेल्या मोबाईल क‘मांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क‘मांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही. योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ‘ी क‘मांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघू पशूवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशूवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशूसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.