खानपान बदलल्यामुळे आजार वाढले !

millet-health अनौपचारिक चर्चेत डॉ.खादर वल्ली यांचे मत

    दिनांक :20-Nov-2023
Total Views |
नागपूर,
 
millet-health भारतात पूर्वी ऋतूनुसार भरड धान्यांचा भारतीय आहारात समावेश व्हायचा. त्यामुळे पोट, पचन आणि आरोग्य सुरळीत राहात होते. मात्र आता सर्व लोकांचे खानपान पूर्णत: बदलल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. आपल्या आहारात भरड धान्यांचा समावेश केल्यास पूर्वीप्रमाणे आपण निरोगी राहू शकू, असा विश्वास पदमश्री डॉ. खादर वल्ली यांनी व्यक्त केला. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत ते बोलत होते. millet-health सध्याच्या घडीला आपण अन्नधान्याच्या रूपात प्रामुख्याने गहू आणि तांदूळावर अवलंबून झालो आहोत. इतर धान्यांचा उपयोग आपल्या आहारात होत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले पोषण द्रव्य मिळत नाही. आजारपणाचे हे एक कारण आहे. millet-health त्यामुळे प्रत्येकांनी पारंपारिक धान्यांना आपल्या स्वयंपाकगृहात स्थान देण्याची गरज आहे.
 
 
millet-health

पोषक धान्य वर्ष millet-health
मिलेट हा प्राचीन धान्याचा एक प्रकार आहे. उन्हाळ्याच्या आहारात कोणते भरड धान्य खावे. ते कसे खावे हे देखील पोषण तज्ज्ञांनी सांगितले आहे. बाजरीचे धान्य रक्तदाब कमी करू शकते आणि गॅस्ट्रिक अल्सर आणि पोटाचा कर्करोग टाळू शकते. भारताने पौष्टिक तृणधान्यांचे आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. millet-health या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, ज्यामध्ये मोठे धान्य संबंधित सविस्तर चर्चा केली जात आहे.

बाजरी पिकवण्यासाठी प्रवृत्त
बहुतांश राज्य सरकारे शेतकर्‍यांना बाजरी पिकवण्यासाठी प्रवृत्त करत आहेत आणि त्याचवेळी ती लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जनजागृतीही केली जात आहे. त्याचा मुख्य उद्देश लोकांना बाजरीसारख्या पौष्टिक धान्यांबद्दल जागरूक करणे हा आहे. millet-health सरकारने मिलेटची लागवड करणार्‍यांना उत्पादन आणि परिपक्वता अनुदान इत्यादी काही सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. मिलेट पासून बनवलेल्या उत्पादनांचा जागतिक बाजारपेठेत आण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्व प्रकारचे तृणधान्याचा उपयोग आपल्या आहारात केल्यास शरीरात कोणताही आजार होत नाही आणि शरीर निरोगी ठेवते.