जम्मू-काश्मीरचे विलीनीकरण काही अल्पज्ञात लष्करी तथ्ये

    दिनांक :23-Nov-2023
Total Views |
रोखठोक
 
- ब्रिगेडियर अनिल गुप्ता
 
 
Jammu and Kashmir : महाराजा हरी सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरचे भारतात केलेले विलीनीकरण हे पूर्ण आणि अंतिम असले तरीही ते अनेक मिथकांनी झाकोळले गेले आहे. शिवाय याबाबतची अनेक तथ्ये अज्ञात आहेत किंवा जबरदस्तीने मांडल्या जाणार्‍या नॅरेटिव्हजमुळे दडपल्या गेली आहेत. 26 ऑक्टोबर रोजी विलीनीकरण झाले आणि भारतीय सैन्य 27 ऑक्टोबरच्या सकाळी श्रीनगरमध्ये दाखल झाले. वन शीख बटालियनची धाडसी कारवाई आणि तिचा डायनॅमिक कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल राय यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही घडामोड आणि त्यानंतरच्या घटना लष्करी इतिहासकार, राजकीय विश्लेषक आणि अधिकार्‍यांनी योग्य प्रकारे नोंदल्या आहेत. विशेष म्हणजे भारतीय सैन्याच्या अधिकृत नोंदी बहुतांश लोकांना माहीत आहेत.
 
Jammu and Kashmir
 
सप्टेंबरच्या मध्यापर्यंत महाराजांनी भारतात सामील होण्याची मानसिक तयारी केली होती. त्यानुसार त्यांनी पाकिस्तानला झुकते माप देणारे पंतप्रधान काक यांना बडतर्फ केले. त्यांनी राज्याच्या सशस्त्र दलातील ब्रिटीश कमांडरलाही रजेसह निवृत्तीवर पाठवले आणि भारत सरकारकडून त्यांच्या जागी Jammu and Kashmir भारतीय लष्कराच्या अधिकार्‍याच्या नियुक्तीची मागणी केली. राज्यात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याची अत्यंत कमतरता होती. महाराजांच्या सरकारने भारताकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा मागितला. त्यांच्या मागणीनुसार पुरवठा करण्यास संरक्षण मंत्रालय उत्सुक होते; परंतु ब्रिटीश अधिकार्‍यांनी त्यात मोडता घालून पुरवठा नाकारला. मावळते ब्रिटीश चीफ ऑफ स्टाफ, जनरल स्कॉट 22 सप्टेंबर रोजी रजेवर निघून गेले. परंतु जाण्यापूर्वी त्यांनी कठुआ ते काराकोरमपर्यंत सुमारे 600 मैल पसरलेल्या राज्याच्या विविध मोर्चावर राज्याचे सैन्य तैनात करून, ते विखरवून टाकले. हे सर्व भूप्रदेश लढाईच्या दृष्टीने कठीण आणि त्रासदायक होते. 9 पायदळ बटालियन्सचा समावेश असलेल्या दलाच्या विखुरण्यामुळे, हे सैन्य कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून राज्याचे रक्षण करण्यासाठी आणि कोणतीही लढाई लढण्यास असमर्थ ठरणार, हे निश्चित झाले. पाकिस्तानच्या ब्रिटिश सैन्य अधिकार्‍यांनी ऑगस्ट 1947 मध्ये राज्य ताब्यात घेण्यासाठी तयार केलेली ऑपरेशन गुलमर्ग ही योजना यशस्वी व्हावी, म्हणून जनरल स्कॉटने हा निर्णय जाणूनबुजून घेतला असावा. वाचकांना कदाचित हे माहीत नसावे की, फाळणीनंतरही सुप्रीम मिलिटरी कमांडर तसेच एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीमधील कमांडर्स इन चीफ ही पदे बि‘टीश अधिकार्‍यांकडे होती. दुसर्‍या बाजूलाही अशीच परिस्थिती होती, फक्त जीना हे पाकिस्तानच्या सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर होते. ऑपरेशन गुलमर्गबाबत ते नियमित टेलिफोन संपर्कात होते.
 
 
जम्मू आणि काश्मीर Jammu and Kashmir राज्य सैन्याच्या संघटनेची जम्मू ब्रिगेड, झांगर ब्रिगेड, पूंछ ब्रिगेड आणि श्रीनगर ब्रिगेड अशी चार गटात विभागणी करण्यात आली होती. नाईन इन्फंट्री बटालियन्स व्यतिरिक्त त्यात सण-समारंभासाठी आणि राजवाड्याच्या कर्तव्यासाठी सुमारे एक कंपनी सैन्य आणि पोलिसांची तुकडी होती. सैन्यात डोग्रा, गोरखा आणि मुस्लिम सैनिकांचा समावेश होता. फिफ्थ बटालियनकडे संपूर्ण जम्मू सीमेची देखरेख करण्याची जबाबदारी होती. झांगर ब्रिगेडकडे दोन बटालियन होत्या, पूंछ ब्रिगेडकडे तीन बटालियन अधिकच्या होत्या, मुझफ्फराबादमध्ये एक बटालियन आणि संपूर्ण फ‘ंटियर प्रदेशात एक बटालियन होती. सण-समारंभाच्या सैन्याव्यतिरिक्त, श्रीनगरमध्ये राखीव म्हणून दोन पायदळ पलटणी होत्या.
 
 
ऑगस्ट 1947 मध्ये पाकिस्तानचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तान आर्मी जनरल हेडक्वार्टरमध्ये तैनात असलेल्या ब्रिटीश अधिकार्‍यांनी ऑपरेशन गुलमर्गची अर्थात भारतावरील मुख्य आक्रमणाची योजना आखली होती. ऑपरेशनचे निर्देश ‘टॉप सिक्रेट’ म्हणून चिन्हांकित केलेल्या पत्रांतर्गत जारी करण्यात आले आणि पाकिस्तानच्या ब्रिटीश कमांडर इन चीफने वैयक्तिकरित्या त्यावर स्वाक्षरी केली. या पत्रावर 20 ऑगस्ट 1947 ही तारीख होती. Jammu and Kashmir भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने 1987 मध्ये प्रकाशित केलेल्या 1947-48 च्या जम्मू आणि काश्मीरमधील ऑपरेशन्सच्या अधिकृत इतिहासात या वस्तुस्थितीचा उल्लेख आढळत असला तरी, फार कमी लोकांना याबद्दल माहिती असून, त्याबद्दल खूप कमी लोकांनी लिहिलेले आहे. ऑपरेशन गुलमर्गची पाकिस्तानी योजना, जी 22 ऑक्टोबर रोजी ऑपरेशन ऑर्डरमध्ये देण्यात आली होती, ती 19 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्कराचे कार्यवाहक चीफ ऑफ जनरल स्टाफ, मिलिटरी ऑपरेशन्सचे कार्यवाहक संचालक आणि भारताचे संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंग यांच्यापुढे मेजर ओंकार सिंग कालकत यांच्यामार्फत उघड करण्यात आली. ओंकारसिंग पाकिस्तानी लष्कराच्या आभासी नजरकैदेतून धाडसाने सुटल्यानंतर त्याच दिवशी नवी दिल्ली गाठण्यात यशस्वी झाले. अशाप्रकारे भारतीय सैन्याला पाकिस्तानच्या काश्मीरवरील आक्रमणाची योजना कळली होती आणि 26 ऑक्टोबरच्या आधीच आकस्मिक योजना तयार केल्या. तेव्हाच महाराजांनी अखेरीस विलीनीकरणाच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली आणि भारत सरकारने काश्मीर वाचवण्यासाठी दुसर्‍या दिवशी भारतीय सैन्य श्रीनगरच्या दिशेने उडवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्याशिवाय श्रीनगरवर कबाईलींचा हल्ला झाला, ही बाब धादांत खोटी आहे.
 
 
22 ऑक्टोबर रोजी कबाईलींच्या (आदिवासींच्या) आक‘मणानंतर मुस्लिम सैन्याने भारतीय सैन्याचा विश्वासघात केला. मुस्लिम सैनिक एकतर आपल्या हिंदू सहकार्‍यांना ठार मारून हल्लेखोरांमध्ये सामील झाले किंवा सैन्य तुकड्या सोडून पळून गेले. महाराजांनी आपले उपपंतप्रधान आर. एल. बत्रा यांना 24 ऑक्टोबर रोजी लष्करी मदतीची विनंती करण्यासाठी दिल्लीला पाठवले. त्यांच्याकडे महाराजांच्या स्वाक्षरीचे विलीनीकरण पत्र देखील होते; ज्यामध्ये Jammu and Kashmir हैदराबादच्या निजामाशी ज्या अटींवर समझोता झाला, त्याच अटींवर भारतात विलीन होण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. माऊंटबॅटन यांच्या प्रभावामुळे आणि सल्ल्यानुसार नेहरूंनी महाराजांची विनंती अव्हेरली. यासाठी त्यांनी, महाराजांनी अधिकृत प्रवेशपत्रावर स्वाक्षरी केलेली नाही, या तांत्रिक कारणाचा दाखला दिला. माउंटबॅटन यांना भारतीय सैन्य पाठवण्यास शक्य तितका विलंब करावयाचा होता; कारण ऑपरेशन गुलमर्गच्या योजनेनुसार पाकिस्तानने 26 ऑक्टोबरपर्यंत श्रीनगर ताब्यात घेण्याची योजना आखली होती. लूट आणि लूटमारीची कबाईलींची लालसा आणि जम्मू काश्मीर राज्य दलांच्या सैन्याने दिलेल्या लढ्यामुळे 26 ऑक्टोबरपर्यंत हल्लेखोर श्रीनगरपर्यंत पोहोचूच शकले नाही. भारतीय सैन्य 25 ऑक्टोबरपर्यंत श्रीनगरमध्ये उतरले असते तर काश्मीर ऑपरेशन्सची कहाणी वेगळी राहिली असती; कारण प्रत्येक दिवस केवळ निर्णायक आणि गंभीर होता.
 
 
अखेर 22 ऑक्टोबरच्या रात्री अबोटाबाद-मानशेरा-मुझफ्फराबाद-डोमेल-उरी-श्रीनगर या रस्त्याने आक‘मणाला सुरुवात झाली. कुपवाडा, गिलगिट, पूंछ आणि मीरपूरच्या सीमेवर उत्तर आणि दक्षिणेकडे अशाच प्रकारची घुसखोरी करण्यात आली. चौथ्या बटालियनच्या (मिश्र) दोन कंपन्या आणि बटालियन मु‘यालय या परिसराचे रक्षण करीत होते; इतर दोन कंपन्या अनुक्रमे केरानंद कोहळा येथे उत्तर आणि दक्षिणेकडे तैनात होत्या. बटालियनचे नेतृत्व राज्य दलातील एक हुशार अधिकारी, कर्नल नारायण सिंग यांच्याकडे होते. क्वेटा येथील स्टाफ कॉलेजमून शैक्षणिक पात्रता मिळवणार्‍या नारायण सिंग यांनी दुसर्‍या महायुद्धात उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्यांचे सैन्य लढाऊ होते. पण त्यांच्या बटालियनच्या मुस्लिम सैन्याने उठाव केल्यामुळे आक्रमकांचे काम सोपे झाले. कंपनी कमांडर आक्रमणकर्त्यांमध्ये सामील झाल्यामुळे सीमेवर तैनात कंपनी पुरेशी झूंज देऊ शकली नाही. काही वेळातच, Jammu and Kashmir आक्रमणकर्ते मुझफ्फराबादला पोहोचले. येथे कर्नल नारायण सिंग यांनी डोमेल येथील कंपनीसह आक्रमकांचा थोडा प्रतिकार केला; परंतु त्यांच्या मुस्लिम सहकार्‍यांनी, या लढाईत सहभागी होण्यास नकार दिला. कर्नल नारायण सिंग त्यांच्या मुस्लिम सैन्याच्या हल्ल्यात मारले गेले अशी भारतीय सैन्याने समजूक करून घेतली. याविरुद्ध त्यांचे सुपुत्र, लेफ्टनंट कर्नल कुलवंत सिंग सम्याल यांनी अपील केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, माझे वडील डोमेल येथे मारले गेले नाही. ते काही सैनिकांसह कोहळा येथील कंपनीत रुजू होण्यासाठी रवानाझाले. यानंतर नेमके काय झाले, हे कोणालाच माहीत नाही आणि त्या कारवाईनंतर त्यांना बेपत्ता घोषित करण्यात आले.
 
 
प्रतिकूल परिस्थिती असूनही प्रभारी चीफ ऑफ स्टाफ बि‘गेडियर राजिंदर सिंग यांच्या धाडसी नेतृत्वाखाली सुमारे 200 च्या सं‘येतील राज्य दलातील सैनिकांनी श्रीनगरच्या चौकीतून तत्परतेने आक्रमकांना रोखण्यासाठी धाव घेतली. Jammu and Kashmir ब्रिगेडियर राजिंदर सिंग यांनी आक‘मणकर्त्यांना रोखून धरण्यासाठी एका लढाऊ रीअर गार्ड ऑपरेशनचे नेतृत्व केले. उरी ब्रिज नष्ट करणे हा त्यांच्या कारवाईचा मास्टर स्ट्रोक होता; ज्यामुळे आक‘मणकर्त्यांना मोटारगाड्या सोडून द्याव्या लागल्या आणि त्यांच्या आक‘मणास विलंब झाला. उरीजवळील महुरा येथे त्यांनी उपलब्ध सैन्यासह हल्लेखोरांना रोखून धरले. श्रीनगर येथे पहिले भारतीय सैन्य उतरण्याच्या काही तासांपूर्वी 27 ऑक्टोबरच्या पहाटे त्यांना अखेर परमोच्च हौतात्म्य प्राप्त झाले. ते भारतीय लष्कराचे महावीर चक्र प्राप्त करणारे पहिले सैन्याधिकारी होते. जम्मूतील डोग्रा समाजाच्या लोकांना असे वाटते की त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल आणि आघाडीवर केलेल्या नेतृत्वासाठी ते परमवीर चक्रसाठी (झतउ) पात्र ठरायला हवे होते. डोगरा सैनिकांनी जिद्द आणि दृढनिश्चयामुळे 22 ते 26 ऑक्टोबर या दरम्यान शत्रूला रोखून धरल्याने काश्मीर पाकिस्तान समर्थित आक‘मकांच्या हाती जाण्यापासून वाचले आणि 26 ऑक्टोबरपर्यंत श्रीनगर काबीज करण्याची त्यांची योजना उधळली गेली.
 
 
जम्मू आणि काश्मीर राज्याचे सैन्य दल मोजकेच आणि शस्त्रांस्त्रांनी सुसज्ज नसतानाही, अत्यंत प्रेरित होऊन या दलाने बजावलेल्या साहसी भूमिकेसाठी भारतीय लोक नेहेमीच त्यांचे ऋणी राहतील. त्यासाठी त्यांनी रक्ताची मोठी किंमत मोजली. या लढ्यात 76 हून अधिक अधिकारी, 31 जेसीओ आणि 1085 इतर शिपायांचे बलिदान दिले. Jammu and Kashmir या पराक्रमासाठी त्यांनी तीन महावीर चक‘, 20 वीर चक्र आणि 52 शौर्य पदके मिळविली. 1 जानेवारी 1949 च्या युद्धविरामापर्यंत या सैन्य तुकड्यांनी भारतासाठी अनेक लढाया लढल्या आणि आक्रमणकर्त्यांना खोर्‍यातून हाकलून देऊन लडाख, पूंछ, नौशेरा आणि राजौरी सेक्टरचे भाग पुन्हा ताब्यात घेतले. अशा प्रकारे भारतीय सैन्याने पूर्वीच्या संस्थानाचा अंदाजे दोन तृतीयांश भाग पाकिस्तानच्या ताब्यातून परत मिळवला. या प्रकि‘येत 1104 भारतीय जवान कामी आले आणि 3154 जखमी झाले, तर भारताने पाकिस्तानच्या 6 हजार जवानांना कंठस्नान घातले व 14 हजार पाकिस्तानी सैनिकांना जखमी केले.
 
 
नेहरू लष्करी सहाय्य देण्यास सहमत होणार नाहीत या भीतीपोटी, Jammu and Kashmir भारत सरकारने लष्करी मदतीची विनंती अमान्य केल्यास, जम्मूला पोहोचल्यानंतर झोपी जाण्यापूर्वी आपल्याला गोळ्या घालाव्या, अशी विनंती महाराजांनी आपल्या एडीसींना 26 ऑक्टोबर रोजी केली होती. तथापि, त्याची गरज भासली नाही. कारण 26 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत व्हीपी मेनन यांनी संरक्षण समितीच्या बैठकीत घेतलेल्या भारत सरकारच्या निर्णयाची माहिती महाराजांना कळवण्यात आली होती.
 
 
(लेखक जम्मूस्थित दिग्गज राजकीय समालोचक आणि सुरक्षा व धोरणात्मक विश्लेषक आहेत.)