अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान

पिक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची शेतकर्‍यांची मागणी

    दिनांक :30-Nov-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
Heavy Rain crop damage : निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे शेतकर्‍यांना दरवर्षी संकटाना तोंड द्यावे लागते. तालुक्यात मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस बरसला. तसेच बुधवारच्या रात्री मुसळधार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या शेतातील खरीप हंगामातील कापूस, तूर व रबी हंगामातील हरभरा, गहू, पालेभाज्या या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडल्याने चिंतेत पडले आहेत. थंडी पडत असताना असताना अचानक ढगाळी वातावरण तयार होऊन 28 नोव्हेंबरच्या रात्री अवकाळी पाऊस, तर 29 नोव्हेंबर रोजी रात्री मुसळधार पाऊस बरसला. शेतकर्‍यांच्या हाताशी आलेले पिक पावसाने हिरावून नेले. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत पडले आहेत.
 
Heavy Rain crop damage
 
शेतकर्‍यांच्या शेतातील तूरीचे पिक सध्या फुलोर्‍यावर असल्याने त्या पिकांना Heavy Rain crop damage पावसाचा फटका बसल्याने ती तूर पूर्ण खाली झुकली. तसेच वेचणीला आलेल्या कापसाच्या पिकांचे फुटलेली बोंडे पावसाने भिजल्याने काळवंडली आहेत. शेतकर्‍यांनी रबी हंगामातील हरभरा, गहू पिकांची पेरणी करून ओलित केले. हरभरा, गहू निघायला नुकतीच सुरवात झाली. या पावसामुळे ओलिताखाली असलेली जमिन दलदल झाल्याने हरभरा, गव्हाचे निघालेले अंकुर सडण्याची भिती शेतकर्‍यांकडुन व्यक्त होत आहे. हरभर्‍याला पाणी जास्त झाल्याने नुकसान झाले आहे.
 
 
शेतातील तूर, कापूस, हरभरा, गहू, ज्वारी, मका, पालेभाज्या, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील खंडाळा येथील नरेंद्र गादेवार या शेतकर्‍याने शेतातील ज्युट या पिकाची कापणी करून ठेवले होते. तेही Heavy Rain crop damage पावसामुळे पूर्ण ओले झाल्याने या शेतकर्‍यांसह तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसात 49 मिमी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.
तालुक्यात Heavy Rain crop damage खरीप हंगामात कापूस 23 हजार 798 हेक्टर, तूर 8 हजार 408 हेक्टर, ज्वारी 67 हेक्टर, बाजरी 42 हेक्टर, मूग 22 हेक्टर, तीळ 3 हेक्टर, ऊस 316 हेक्टर, तृणधान्य 35 हेक्टर जमिनीवर पिकांची पेरणी केली होती. रबी हंगामात हरभरा 6 हजार 850 हेक्टर, गहू 2 हजार 350 हेक्टर, ज्वारी 90 हेक्टर, मका 65 हेक्टर, भाजीपाला 125 हेक्टर जमिनीवर पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आनंद बदकल यांनी दिली.