तभा वृत्तसेवा
कुर्हा,
Turi Ghateali : ऐन दिवाळीच्या तोंडावर ढगाळ वातावरण आल्यामुळे आतापर्यंत बर्या असलेल्या तुरीच्या पिकावर अचानक शेंगा पोखरणार्या घाटे अळीने हल्ला केला आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी त्रस्त्र दिसून येत आहे. कृषि विभागाने याबाबत शेतकर्यांना काही सूचनासुद्धा दिल्या आहेत.
तूर हे महाराष्ट्रातील डाळवर्गातील एक प्रमुख पीक आहे. तसेच Turi Ghateali तूर या पिकाचे सरासरी उत्पन्न कमी असते. या डाळवर्गीय पिकावर पेरणीपासून ते पीक निघेपर्यंत जवळजवळ 200 प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. परंतु फुले व शेंगावर होणार्या किडीचे आक्रमण अतिशय नुकसानकारक ठरले आहे. हे नुकसान सर्वात जास्त होत असल्याने उत्पन्नात घट दिसते व चांगल्या प्रतीचे बियाणे तयार होत नाहीत. कधी कधी साथीच्या स्वरुपात कीड आल्यास 70 टक्के पेक्षाही अधिक नुकसान शेंगा पोखरणार्या या किडीपासून होते. त्यात शेंगमाशी मुळे 50 ते 60 टक्के नुकसान दाण्यांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामानामुळे खरीप हंगामातील Turi Ghateali तूर पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. शेतकर्यांनी कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांच्या सल्ल्याने फवारणी करावी. सुरवातीच्या काळात तूर पिकात शेंगा पोखरणारी अळी ही कोवळी पाने, फुले किंवा शेंगा भरताना कोवळे दाणे खातात. तसेच दाण्यात किड झाल्याने ते उपयोगी पडत नाहीत. कमी कालावधीत येणार्या जाती व जास्त आर्द्रता असलेल्या भागात किडींचा जास्त प्रादुर्भाव दिसतो. परिसरातील शेतकरी सध्या या संकटाशी सामना करीत आहे.