भारत आणि दक्षिण कोरियाच्या संबंधांना ५० वर्षे पूर्ण

    दिनांक :10-Dec-2023
Total Views |
नवी दिल्ली,  
India-South Korea relations भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, पीएम मोदींनी सोशल मीडिया  ट्विटरवर भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील राजनैतिक संबंधांबाबत एक पोस्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंधांची प्रशंसा केली आणि याला परस्पर आदर, सामायिक मूल्ये आणि वाढत्या भागीदारीचा प्रवास म्हटले आहे.
 
India-South Korea relations
पीएम मोदींनी ट्विटरवर लिहिले- 'आम्ही भारत आणि कोरिया प्रजासत्ताक यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची 50 वर्षे साजरी करत आहोत. परस्पर आदर, सामायिक मूल्ये आणि वाढत्या भागीदारीचा हा प्रवास आहे. India-South Korea relations दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की, दोन्ही देशांमधील विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल आणि विस्तारित करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला, दक्षिण कोरियाचे राजदूत चांग जे-बोक यांनी घोषणा केली होती की दक्षिण कोरिया उच्च-मूल्याच्या प्रकल्पांसाठी पुढील तीन वर्षांत भारताला US $ 4 अब्ज देईल.